Women Empowerment

 

Dainik Gomantak

गोवा

महिलांच्या सबलीकरणासाठी झटले पाहिजे: भार्गवी चिरमुले

पर्वरी रायझिंगतर्फे महिला मेळाव्याचे आयोजन..

दैनिक गोमन्तक

भारतीय संस्कृतीत स्त्रीला देवी समान पुजले जाते. पण आज परकीय संस्कृतीच्या प्रभावामुळे किंवा अन्य कारणामुळे स्त्रीला वाढत्या अत्याचारांना सामोरे जावे लागत आहे. हे कुठे तरी थांबवायला पाहिजे. महिलांचा (Women) सन्मान करणे आवश्यक आहे. प्रगल्भपणे मानवतावादी जाणीवेतून वाढत्या स्त्रीभ्रूणहत्या (Female feticide) थांबवायला पाहिजे. त्यासाठी जनजागृती (Awareness) होणे आवश्यक आहे. आपल्याला महिलांच्या सबलीकरणासाठी (Women Empowerment) झटले पाहिजे, असे मत भार्गवी चिरमुले यांनी पर्वरी (Porvorim) येते महिला मेळाव्यात काढले.

सुकुर येथील पंचायत सभागृहात पर्वरी रायझिंगतर्फे आयोजित महिला मेळाव्यात त्या प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होत्या. व्यासपीठावर आमदार रोहन खंवटे, सरपंच स्वप्निल चोडणकर, संदीप साळगावकर, कविता नाईक, डॉ. संध्या कदम, श्यामसुंदर कामत व अन्य उपस्थित होते.

पर्वरी मतदार संघ निर्माण झाल्यापासून मी या मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहे. आजवर अनेक विकासकामे केली आहेत. मतदारसंघात पाच ते सहा हजार महिलांचे सेल्फ हेल्प गट स्थापन करून महिलांचे सशक्तीकरण केले आहे. त्यांना आपल्या पायावर उभे केले आहे. त्यांचे मानसिक व शारीरिक खच्चीकरण होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले आहे, अशी माहिती आमदार रोहन खंवटे यांनी काढले.

या मेळाव्याला पर्वरी मतदारसंघातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. भार्गवी चिरमुले यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वर्षा मळीक यांनी सूत्रसंचालन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT