Zero Shadow Day In Goa 
गोवा

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Zero Shadow Day In Goa: सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर आपली सावली आपल्याला दिसत नाही, यालाचा शून्य सावली दिवस म्हणतात.

Pramod Yadav

Zero Shadow Day In Goa

'मी तुझी सावली सारखी सोबत करेन' अशी म्हण आपण नाते किती घट्ट आणि अतूट आहे हे सांगण्यासाठी वापरतो. पण, विज्ञानात असाही एक दिवस येतो ज्यावेळी सावली देखील आपली साथ सोडते. भरदुपारी सावली आपल्या जवळून गायब होते याला विज्ञानाच्या भाषेत , 'शून्य सावली दिवस' (Zero Shadow Day) म्हणतात.

गोव्यात 1 आणि 2 मे या दिवशी 'शून्य सावली दिवस' अनुभवता येणार आहे.

दुपारच्या वेळी सूर्य जेव्हा डोक्यावर असतो त्यावेळी शून्य सावलीचा अनुभव घेता येईल. 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण अक्षांश असलेल्या भागातच शून्य सावली पाहायला मिळते. सूर्य अक्षांश रेषेच्या अगदी वर असतो त्यावेळी शून्य सावली अनुभवता येते.

विज्ञानातील या घटनेचा साक्षीदार होण्याची संधी गोमन्तकीयांना मिळणार आहे.

गोव्यात रवींद्र भवन, मडगाव आणि जुंता हाऊस, पणजी येथे नागरिकांसाठी शून्य सावलीचा अनुभव घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नागिरकांना दुपारी १२.१५ते १२.४५ या वेळेत या स्थळांना भेट देता येईल. सर्वांसाठी मोफत प्रवेश असणार आहे.

शून्य सावली म्हणजे काय?

सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर आपली सावली आपल्याला दिसत नाही, यालाचा शून्य सावली दिवस म्हणतात. पृथ्वी तिच्या अक्षावर 23.5 अंशांनी झुकल्यामुळे शून्य सावलीची स्थिती निर्माण होते, असे वैज्ञानिक सांगतात. ऋतू बदलण्याचेही हेच कारण असल्याचे तज्ञ सांगतात.

महत्वाचे म्हणजे 23.5 अंश उत्तर आणि 23.5 अंश दक्षिण अक्षांश भागातच शून्य सावली दिवस अनुभवता येतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT