Vishwajit Rane  Dainik Gomantak
गोवा

'कदंब पठाराला युनिफॉर्म एफएसआय द्यावा'

विश्वजीत राणेंचं वक्तव्य; पालिकांनी स्वत:चे मास्टरप्लान तयार करण्याचंही आवाहन

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजी शहराला नैसर्गिक वाढीवर मर्यादा आहेत. शहर वाढीसाठी कदंब पठार हा अत्यंत उपयुक्त भाग आहे, जिथे पणजीची पुढील वाढ होऊ शकते. माझे वडील मुख्यमंत्री असताना या पठारावरून रस्ता तयार केला. पुढे मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री झाल्यावर या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले. त्यामुळे या भागात युनिफॉर्म एफएसआय देणे आवश्यक आहे असे वक्तव्य मंत्री विश्वजीत राणे यांनी केलं आहे. गोमन्तकला दिलेल्या खास मुलाखतीत त्यांनी विविध विषयांवर सडेतोड भाष्य केलं.

पणजी शहरात महापालिकेपेक्षा नगर नियोजन आणि विकास प्राधिकरणाला अधिक अधिकार आहेत. यासाठी महापालिकेसह सर्व पालिकानी स्वतःचे मास्टर प्लान तयार करणे गरजेचे आहे. त्याशिवाय त्यांचा विकास सुनियोजित होणार नाही. यासाठी अनुभवी आणि जाणकार तज्ज्ञांचा मदत घेणे गरजेचे आहे. तसे निर्देश मी महापालिका आणि पालिका प्रशासनाला दिले आहेत. असेही राणे म्हणाले.

दरम्यान गोव्यातील काँग्रेस नेतृत्वावर नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांनी थेट निशाणा साधला आहे. गोव्यात कॉंग्रेस पक्षाकडे नेतृत्वाचा अभाव आहे. आज आहेत ते उद्या कुठे जाणार, हे माहीत नाही. जे नेते झाले आहेत त्यांना तीन महिने देखील अजून झालेले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षाची मनःस्थिती चांगली नाही, अशा शब्दात विश्वजीत राणेंनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. विरोधी पक्षनेते देखील नवे आहेत त्यांच्यापाशी कोणतीही विचारधारा नाही, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT