Utpal Parrikar Dainik Gomantak
गोवा

Utpal Parrikar : मोन्सेरात यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे : उत्पल पर्रीकर

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात पर्रीकर यांचे भाष्य

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांना मंत्रिपदावरून काढून टाकावे, अशी मागणी पणजी शहरावर स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या रूपाने ओढवलेल्या संकटावर भाष्य करताना उत्पल पर्रीकर यांनी आज ‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात बोलताना केले.

‘मी वाट पहातोय पणजीत काही घडण्याची’ असे त्यांनी (मोन्सेरात) वक्तव्य केले आहे. ते नुसते पहात बसणार असतील, तर त्यांनी घरी बसावे. स्वस्थ बसून पाहणार असतील तर आमदारकीचाही त्यांनी राजीनामा द्यावा. 15 ट्रक रस्त्यावर अडकून रूतेतोपर्यंत ते स्वस्थ बसणार काय?’ असा सवाल उत्पल यांनी केला.

मुख्यमंत्र्यांनी केवळ एका महिन्यापूर्वी पणजीत लक्ष घालायला सुरुवात केली आहे. त्यापूर्वी दोन वर्षे बाबूश मोन्सेरात यांना भाजप सरकारने पणजी आंदण दिल्यासारखी स्थिती होती. मोन्सेरात करेल ती पणजीत पूर्व दिशा ठरत होती, असे विचारता उत्पल म्हणाले : असे का घडत होते, हे भाजप नेतृत्वालाच तुम्हाला विचारावे लागेल. याच मुद्यावर मी पणजीची निवडणूक लढविली आहे. बाबूश मोन्सेरात यांच्यासारखा उमेदवार तुम्ही पणजीवर कसा लादला?

उत्पल म्हणाले, निवडणुकीवेळी बाहेरून आलेल्या दबावांचीही मी पर्वा केली नाही. माझे वडील मनोहर पर्रीकर यांनी ज्या पक्षात ३० वर्षे घालविली, तेथे असे व्हायला लागले. (मोन्सेरात यांना पणजीचे उमेदवार बनविले.) त्याच्या पुढे जाऊन, लोटांगण घालून पक्षश्रेष्ठींपुढे असा आभास निर्माण करण्यात आला की, त्यांचेच पणजीवर प्राबल्य आहे.

त्यामुळे मला निवडणूक रिंगणात उडी घेऊनच दाखवावे लागले की, त्यांच्याकडे ‘कमळ’ निशाणी होती, म्हणूनच ते पणजीत जिंकून येऊ शकले; परंतु पणजीचे सर्व कार्यकर्ते आणि बहुसंख्य मतदार माझ्या मागे होते. भाजपचे चिन्ह मिळाल्यामुळे बाबूशचा राजकीय फायदा झाला असेल; परंतु पणजीवासीयांचे मात्र हाल झाले!

‘त्या’ आरोपांची चौकशी करा!

‘मनोहर पर्रीकर यांनी आपल्या सरकारचे बलिदान दिले; कारण बाबूश यांनी चूक केली होती. त्यांना मंत्रिमंडळातून काढले, तेव्हा भाजप सरकार पुन्हा अधिकारावर येऊ शकेल काय, याची शाश्‍वती नव्हती. परंतु त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यात आले.

आताही ते पणजीच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे, असे म्हणतात. म्हणून त्यांना डच्चू देण्याची गरज आहे. त्यांनी नोकर भरतीतही भ्रष्टाचार झाला, असा आरोप केला होता. त्यामुळे त्यांच्या आरोपांची एक तर चौकशी केली पाहिजे किंवा त्यांना काढून टाकायला हवे, असे उत्पल म्हणाले.

...अन् तेच घडतेय

उत्पल म्हणाले की, ‘तुम्ही माझ्या त्यावेळच्या मुलाखती काढून पहा, पणजीच्या राजकारणाचे अवमूल्यन होतेय, हे मी ठासून सांगत होतो व जी भीती मी व्यक्त करत होतो, तेच आता पणजीत घडताना दिसतेय. खोटेपणाचा आधार घेणे, नोकऱ्यांचे आमिष, पणजीच्या उन्नतीच्या बढाया, कॅसिनो हटविण्याचा शब्द देणे, पणजीत त्यांना उमेदवारी देणे, जिंकून आणणे ही चूक होती. आज जे काय चालले आहे, तो त्या चुकीचा परिणाम आहे.’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sunburn Festival: 'गोव्याशी तुलना करू शकत नाही...' मुंबईतील पहिल्या सनबर्न फेस्टिव्हलबाबत 'EDM' चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया

अक्षय खन्नावर कौतुकाचा वर्षाव, आर. माधवनचा होतोय जळफळाट? म्हणाला, "तो स्वतःमध्येच..."

Imran khan: इम्रान खानचे पाय आणखी खोलात; पत्नी बुशरा बीबीसह 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाचा मोठा निर्णय

VIDEO: अफलातून कॅच! मार्नस लॅबुशेची हवेत उडी अन् एका हाताने भन्नाट झेल, पाहा व्हिडिओ

Goa ZP Election 2025 Live Update: साळमधील मतदान केंद्रावर तणाव; कडक पोलीस बंदोबस्त तैनात, परिस्थिती नियंत्रणात

SCROLL FOR NEXT