Subhash Velingkar Dainik Gomantak
गोवा

Marathi Language: 'मराठी न टिकवल्यास भवितव्य राहणार नाही'! वेलिंगकरांचे प्रतिपादन; लढ्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन

Subhash Velingkar: वेलिंगकर म्हणाले की,आपला हा लढा प्रत्येक तालुक्यात चालूच राहणार आणि तो लढा निर्णयक असा असून येत्या डिसेंबरपर्यंत मराठी राजभाषेचा दर्जा मिळवून देणारा असेल.

Sameer Panditrao

बार्देश: राज्यात मराठी न टिकवल्यास पुढील पिढीला भवितव्य राहणार नाही. मराठी ही संस्कृतीची भाषा आहे. म्हणून मराठी भाषिकांनी एकत्रितपणे लढ्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे गोवा समितीचे संस्थापक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी केले.

खोर्ली म्हापसा येथील श्री सातेरी सभागृहात आयोजित मराठीप्रेमींच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गो. रा. ढवळीकर, साहित्यिक शंभू भाऊ बांदेकर, भाई मोये, नारायण राटवड, तुषार टोपले, डॉ. अनिषा येंडे, ॲड. रोशन सामंत, भाई पंडीत, उमेश म्हालदार व अभय सामंत उपस्थित होते.

पुढे बोलताना वेलिंगकर म्हणाले की,आपला हा लढा प्रत्येक तालुक्यात चालूच राहणार आणि तो लढा निर्णयक असा असून येत्या डिसेंबरपर्यंत मराठी राजभाषेचा दर्जा मिळवून देणारा असेल. समितीचे मार्गदर्शक गो.रा. ढवळीकर म्हणाले की, मंदिरे, सोसायटी व इतर स्थानाचे इतिवृत्तांत मराठीतून लिहिले जातात.

मराठीतून प्राथमिक शाळांतून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.गोव्यात अनेक मराठी साहित्यिक आहेत. साहित्य लिहितात आणि वाचक त्याचे साहित्य वाचतात. प्रखंड मेळाव्याचे अध्यक्ष नारायण राटवड म्हणाले की, गोवा महाराष्ट्रापासून वेगळा असला तरी भौगोलिकदृष्ट्या एक आहे. आम्ही कोकणी भाषेचे दुष्मन नाही. पण सरकार मराठीला डावलण्याचा प्रयत्न करते.

ॲड. रोशन सामंत यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन ऋतुजा आर्लेकर यांनी केले. अमोघ लोटलीकर यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT