Union Minister of State for Agriculture Shobha Karandlaje said Central Government to assist Goa Government Dainik Gomantak
गोवा

Goa: केंद्र सरकार मदत करणार; केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यास उत्सुक

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात एकात्मिक कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास केंद्र उत्सुक आहे, असे केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी मत व्यक्त केले. गोव्यात एकात्मिक कृषी विद्यापीठाची आवश्‍यकता आहे. गोवा सरकारला केंद्र सरकार मदत करील असे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार गोव्यात कृषी आणि फलोत्पादन महाविद्यालय स्थापन करण्यासाठी आवश्यक ते सहाय्य करण्यास उत्सुक आहे. कृषीमंत्र्यांनी आयसीएआरला भेट दिली तसेच अधिकारी आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि तेथे एक रोपटेही लावले.

शेतीला एक आकर्षक व्यवसाय पर्याय बनवण्यासाठी अनेक आधुनिक शेती पद्धतींचा वापर करत आहेत त्या पर्रा येथील प्रगतीशील शेतकरी दर्शना पेडणेकर यांचाही त्यांनी सन्मान केला. आज सचिवालयात त्यांनी कृषीमंत्री व उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर तसेच कृषी खात्याचे सचिव व अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन गोव्यात कृषीसंदर्भात असलेल्या समस्या तसेच केंद्र सरकारच्या असलेल्या योजना यासंदर्भात चर्चा केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT