Goa Traffic Issue  Dainik Gomantak
गोवा

Goa Traffic Issue: रायबंदर येथे वाहतूक कोंडी; लोकांना त्रास

Goa Traffic Issue: पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना आता रायबंदर येथेदेखील ही समस्या सुरू झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Traffic Issue: पणजी स्मार्ट सिटीच्या कामामुळे पणजी शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असताना आता रायबंदर येथेदेखील ही समस्या सुरू झाली आहे. सकाळी आणि सायंकाळी वाहतूक कोंडीमुळे जुन्या रस्त्यावरून वाहतूक करणाऱ्यांची गैरसोय होत असून नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्मार्ट सिटीच्या कामासाठी पणजीप्रमाणे रायबंदर येथेदेखील रस्ते खोदले गेले आहेत. जुना रस्ता अरूंद असल्याने येथे जागा कमी आहे. त्यात दोन्ही बाजूला काम सुरू असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होतो.

सकाळी आणि सायंकाळी शाळा, कचेरी वेळ असल्याने वाहतूक जास्त असते. त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत.

मुख्य म्हणजे संयम कमी असल्याने कोणीही थांबण्यास तयार नसतो. येथे वाहतूक पोलिस नसल्याने वाहतूक सुरळीतपणे चालणार याची खात्री करून घ्यायला कोणी नाही. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. या सगळ्यात सर्वसामान्यांना त्रास होत आहे.

पणजी-फोंडा महामार्गावरही चिंबल नाक्यावर पुलाचे काम सुरू असल्याने त्या टप्प्यात वाहतूक कोंडी होताना दिसते. यासाठी अनेकजण जुन्या रस्त्यातून जात असल्याने येथे आणखी वाहतूक वाढल्याने वाहतुकीवर ताण वाढला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

SCROLL FOR NEXT