Tillari Dam Dainik Gomantak
गोवा

Tillari Dam: अखेर 50 दिवसानंतर तिळारीतून आले गोव्यासाठी पाणी; पर्वरी, साळगावची तहान भागणार

22 डिसेंबरपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन होते.

गोमन्तक डिजिटल टीम

Tillari Dam: पर्वरी आणि साळगावची तहान भागण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तिळारी धरणाकडून गोव्याकडे येण्यास कालव्यातून पाणी झेपावले आहे. पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात ते पाणी पोहोचले की दुसऱ्या दिवसापासून पर्वरी आणि साळगावला पुरेसा पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

तिळारी धरणाचे पाणी गोव्यात वाहून आणणाऱ्या कालव्यांची 25 वर्षांनंतर दुरुस्ती करण्यासाठी 27 नोव्हेंबरपासून पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. 22 डिसेंबरपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन होते.

प्रवाह बंद करण्यासाठी तिळारी धरणाचा कालव्यात उघडणारा दरवाजा खाली आणण्यात आला होता. त्यामुळे प्रवाह पूर्णतः बंद झाला होता.

कित्येक वर्षांनी तो दरवाजा हलविण्यात आला होता. त्या दरवाज्यावर दोन हजार टन पाण्याचा दाब पडल्याने तो थोडासा कलला, त्यामुळे तो जागचा हलणे बंद झाले. त्यामुळे दरवाजा अभियांत्रिकी कौशल्ये वापरून वर उचलण्याचे ठरवण्यात आले. त्यासाठी पुणे येथून तंत्रज्ञ मागवण्यात आले. अखेर त्यांना यश मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sudip Tamhankar Attack: म्हापशात खळबळ! बसमालक नेते सुदीप ताम्हणकर यांच्यावर जीवघेणा हल्ला; 7 ते 8 जणांच्या टोळक्यानं गाठलं

Zambaulim: सफर गोव्याची! श्री दामोदरांचा आशीर्वाद लाभलेले, निसर्गसंपन्न 'जांबावली' गाव

Goa Accident: काळ आला होता पण वेळ आली नव्हती! रेडी घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात; एकजण गंभीर जखमी

Indonesia Landslide: रात्री गाढ झोपेत असताना 'काळ' आला! इंडोनेशियात भूस्खलनात 21 जणांचा मृत्यू; 80 हून अधिक बेपत्ता VIDEO

IND vs NZ: 'तू इंडियासाठी खेळण्यास लायक आहे का?' धडाकेबाज खेळीनंतर ईशान किशननं सांगितला स्वतःला सिद्ध करण्याचा थरार

SCROLL FOR NEXT