दोडामार्ग येथे 'तिळारी'च्या कालव्याला फुटला बांध Dainik Gomantak
गोवा

मणेरी-दोडामार्ग येथे 'तिळारी' च्या कालव्याचा फुटला बांध

पाण्याचा (Water) प्रवाह जोराचा असल्याने 50 ते 60 मीटर भरावाचा भाग खाली कोसळला. गोव्यातील (Goa)पाणी पुरवठ्यावर परिणाम.

दैनिक गोमन्तक

डिचोली: महाराष्ट्र (Maharashtra)आणि गोवा (Goa) राज्याचा संयुक्त प्रकल्प असलेल्या तिळारीच्या डाव्या बाजूच्या मुख्य कालव्याला आज पहाटे दोडामार्ग तालुक्यातील धनगरवाडी-मणेरी येथे भगदाड पडले. कालवा फुटल्याने तिळारीतून गोव्यात होणारा पाणीपुरवठा पुन्हा बंद झाला आहे. पावसाळ्यात या कालव्यातून पाणी पुरवठा बंद होता. अलीकडेच कालव्यातून पाणी सोडण्यात आले होते.

मणेरी- धनगरवाडी येथे एका नाल्यावर पाईप टाकून त्यावर मातीचा भराव टाकून केलेल्या डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडण्याची घटना रविवारी पहाटे तीन ते चार वाजण्याच्या सुमारास घडली. कालव्याला भगदाड पडताच, पाण्याचा जोरदार प्रवाह जवळपासच्या शेती आणि काजू बागायती मध्ये शिरला.

ही घटना समजताच तिळारी प्रकल्पाचे अधिकारी (Project Officer) तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली. आणि तातडीने पाणी पुरवठा बंद केला.

मणेरी धनगरवाडी येथे एक लहान नाला आहे. यावर एक मोरी बांधून यावर माती भराव टाकून हा कालवा तयार केला होता. कालव्याला ज्याठिकाणी भगदाड पडले आहे, त्याठिकाणी गळती गळती सुरू होती. स्थानिक शेतकरी आणि केळी,अननस लागवड केलेल्या परप्रांतीय बागायतदारांनी तिळारीच्या संबंधित अभियंत्यांना दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने ही घटना घडली. अशी माहिती मिळाली आहे.

दहा महिन्यातील दुसरी घटना

गेल्या जानेवारी महिन्यात याच डाव्या बाजूच्या कालव्याला साटेली-भेडशी-खानयाळे येथे भगदाड पडले होते. त्यानंतर आता मणेरी भागात कालव्याला भगदाड पडल्याने कालव्याच्या बांधकामाचा निकृष्ट दर्जा स्पष्ट झाला आहे. तिळारी धरणाच्या डाव्या उजव्या कालव्याच्या बांधकामांना अनेक वर्षे झाली आहेत. पण देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने दोन्ही कालवे कमकुवत झाले आहेत. अशी माहिती मिळाली आहे. या कालव्याच्या दुरुस्ती कामावर कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र कालव्याला भगदाड पडण्याच्या घटनांमुळे या खर्चाबाबत साशंकता निर्माण होत आहे.

कालव्यातून पाणीपुरवठा बंद

मणेरी येथे कालव्याला भगदाड पडताच मातीचा भराववर वाढलेल्या झाडीसह कोसळत राहिला. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्याने पन्नास ते साठ मीटर भरावाचा भाग खाली कोसळला. त्यामुळे तिलारीच्या कर्मचाऱ्यांनी कळविल्यानंतर तातडीने पाणी बंद करण्यात आले. पाणी बंद केले तरी सकाळी साधारण दहा वाजेपर्यंत कालव्यातून पाणी सुरु होते. अकरा वाजण्याच्या सुमारास पाणी कमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मुंबई इंडियन्सने शेअर केला चिमुकल्यांनी बनवलेल्या किल्ल्यांचा व्हिडिओ, फॅन्स म्हणाले, "म्हणूनच हा संघ आमच्यासाठी खास..."

Rama Kankonkar Attack: 'बेल' नाही, 'जेल'च! जेनिटोचा जामीन न्यायालयानं फेटाळला; तुरुंगातील मुक्काम वाढला

Gujarat Violence: धार्मिक कार्यक्रमावरून गुजरातमध्ये हिंसाचार; घरांची तोडफोड, 30 वाहने जाळली, 10 जखमी

भुसावळ ते गोवा थेट रेल्वे सेवेची मागणी! मुंबईचा त्रास टळणार; हजारो कोकणवासीयांचा वेळ आणि पैसा वाचणार

Rohit Sharma Record: सचिन, कोहलीला जे जमलं नाही, ते रोहित ऑस्ट्रेलिया मालिकेत करणार! फक्त 'इतक्या' षटकारांची गरज, विश्वविक्रम रचणार

SCROLL FOR NEXT