Sadanand Tanawade Dainik Gomantak
गोवा

Goa BJP : मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत सदानंद तानावडे यांचं सुचक वक्तव्य

मुख्यमंत्री सावंत आणि तानावडे यांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या

दैनिक गोमन्तक

Goa cabinet : राज्यात मंत्रिमंडळ फेरबदलाच्या जोरदार चर्चा असताना भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी या सर्व शक्यता फेटाळून लावल्या आहेत. तूर्तास फेरबदलाची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले.

मागील आठवड्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केंद्रीय नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या.

अर्थात त्यावेळी भाजपशासित प्रदेशांमधील अध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांची बैठक होती आणि त्यामध्ये येणाऱ्या चार राज्यांतील विधानसभांच्या निवडणुकांवर चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर शनिवारी मुख्यमंत्री पुण्याला गेल्यानंतर ते दिल्लीला गेलेत आणि मंत्रिमंडळ फेरबदलावर शिक्कामोर्तब होणार अशा चर्चांना ऊत आला होता.

यासंदर्भात तानावडे म्हणाले, की राज्यातील मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चा म्हणजे केवळ अटकळे आहेत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत अल्पावधीतच दुसऱ्यांदा दिल्ली दौऱ्यावर गेल्याने २ कॅबिनेट मंत्र्यांना वगळण्यात आले आणि २ काँग्रेस पक्षांतरित आमदारांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश झाल्याच्या चर्चांना उधाण आले होते, हे फक्त अनुमान आहेत.

अशा प्रकारची कोणतीही हालचाल झाल्यास मुख्यमंत्री त्यावर निवेदन करतील, पण मी निश्चितपणे सांगू शकतो की किमान सध्या तरी मंत्रिमंडळात फेरबदल होणे शक्य नाही. मुख्यमंत्री वैयक्तिक भेटीवर दिल्लीत गेले असून त्यांनी काही केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली आहे, असा दावाही तानावडे यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Drunk Driving: अपघातांना आळा बसण्यास होईल मदत! मद्यपी चालकांबाबतच्या निर्णयाचे मायकल लोबोंकडून स्वागत

ST Reservation: 'एसटी' आरक्षणाबाबत वेळकाढूपणा! 'मिशन पॉलिटिकल रिझर्व्हेशन'तर्फे जागृती मोहिमेस सुरवात

खरी कुजबुज: घोषणांपलीकडचे राजकारण!

Cricket Retirement: क्रिडाविश्वात खळबळ! विश्वचषकातून बाहेर पडताच 3 दिग्गज खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला 'रामराम'

ग्रामशक्तीचा विजय; शहरीकरणाला 'ब्रेक', एकजुटीपुढे सरकारची माघार

SCROLL FOR NEXT