Tejashwi Yadav
Tejashwi Yadav Dainik Gomantak
गोवा

Tejashwi Yadav: गोवा नव्हे बिहारमध्ये येतात सर्वाधिक पर्यटक! उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा दावा

Pramod Yadav

गोवा नव्हे तर बिहारमध्ये सर्वाधिक पर्यटक येतात असा दावा बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी (Tejashwi Yadav) यादव यांनी केला आहे. तसेच, बिहारला पर्यटनात (Bihar Tourism) अधिक वाव असल्याचे वक्तव्य देखील यादव यांनी केले आहे.

दक्षिण आशियातील अनेक बौद्ध देशातील लोक बिहारला भेट देत असतात. खासकरण पिंडदान करण्यासाठी लोक येत आसतात. असेही यादव म्हणाले. राज्यात पर्यटनाला वाव असून येणाऱ्या पर्यटकांनी येथे अधिक वेळ व्यतित करावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव म्हणाले.

"बिहारमध्ये पर्यटनाला भरपूर वाव आहे. गोव्यापेक्षा या राज्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक आहे. मग ते 'पिंड दान' असो किंवा अनेक दक्षिण आशियाई बौद्ध देशांतून राज्याला भेट देणारे लोक असोत. राज्यात पर्यटक अधिकाधिक वेळ घालवतील यासाठी प्रयत्न करणे हे एक आव्हान सरकारसमोर आहे." तेजस्वी यादव म्हणाले.

बिहार हे महत्वाचे बौद्ध तीर्थक्षेत्र असून, येथे बोधगया आहे. अनेक लोकांना ही पर्यटनस्थळे आकर्षित करत असतात. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत देखील याचा समावेश करण्यात आला आहे. बिहारच्या बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि नालंदा अवशेष यांचा युनेस्को जागतिक वारसा स्थळे म्हणून घोषित केले आहे.

एका अहवालानुसार, 2019 मध्ये तब्बल 3.5 कोटी पर्यटकांनी बिहारला भेट दिली. 2001 मधील 85,673 पर्यटक संख्येवरून 2019 मध्ये ती 10.9 लाख झाली आहे. ही वाढ 12 पटीने झाल्याचा दावा राज्याच्या पर्यटन विभागाने केला आहे.

तर, गोव्यात (Goa Tourism) कोरोना संसर्गानंतर पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी 81 लाख पर्यटक गोव्याला भेट देतील असे अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, 2019 मध्ये सुमारे नऊ लाख (0.9 दशलक्ष) आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि 72 लाख (7.2 दशलक्ष) देशांतर्गत पर्यटकांनी गोव्याला भेट दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Sex Scandal Case : कर्नाटकातील सेक्स स्कँडल प्रकरणाचा गोव्यावर परिणाम नाही : सदानंद तानावडे

Goa Today's Live News: इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर किमान 10-15 राज्यातील सरकार कोसळतील - पवन खेरा

India Canada Relations: जस्टिन ट्रुडोचे पुन्हा बरळले, आम्ही खलिस्तानसोबत आहोत; भारतासोबतच्या संबंधांवर काय म्हणाले?

Loksabha Election : प्रचारासाठी पायाला भिंगरी, जनसामान्‍यांना भेटीची आस; पल्‍लवी धेंपे यांचा प्रचार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

SCROLL FOR NEXT