Manoj Parab Dainik Gomantak
गोवा

Manoj Parab: मलनिस्सारण प्रकल्पापूर्वी ग्रामस्थांशी बोला, मनोज परब

मनोज परब: लोकांना प्रकल्प नको तर आग्रह का? उंडीर येथे ग्रामस्थांसोबत घेतली सभा

दैनिक गोमन्तक

Manoj Parab: उंडीर येथील लोकांवर लादण्यात येणाऱ्या मलनिस्सारण प्रकल्पाच्या उभारणीपूर्वी आमच्याशी आणि ग्रामस्थांशी चर्चा करा, स्पष्टपणे काय ते सांगा आणि मगच निर्णय घ्या, असे मत रिव्होल्युशनरी गोवन्सचे प्रमुख मनोज परब यांनी व्यक्त केले. उंडीर - बांदोडा येथे काल उंडीर ग्रामस्थ व रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे आयोजित संयुक्त सभेत मनोज परब यांनी संबोधित केले.

लोकांना जर हा प्रकल्प नको असेल, तर आग्रह का धरता, असा सवाल करून गोमंतकीयांना त्रास देण्यापेक्षा हा प्रकल्प शापूर - बांदोड्यातील झोपडपट्टीत उभारा, असेही मनोज परब म्हणाले.

उंडीर येथील म्हारू देवस्थान सभागृहात झालेल्या या सभेला सांतआंद्रेचे आमदार वीरेश बोरकर तसेच आरजीचे प्रेमानंद गावडे, विश्‍वेश नाईक, शैलेश नाईक यांच्यासह म्हारू देवस्थानचे मुकुंद नाईक, तुळशीदास नाईक व सदानंद नाईक आदी उपस्थित होते.

आमदार वीरेश बोरकर म्हणाले की, सध्याचे सरकार हे हुकुमशहा झाले आहे. गोमंतकीयांच्या हिताविरोधात वागणाऱ्या या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची गरज असून राज्यात लोकांना नको असलेले प्रकल्प सध्या या सरकारकडून लादले जात असल्याने आता लोकांनीच त्याविरुद्ध पेटून उठण्याची आवश्‍यकता आहे.

यावेळी प्रेमानंद गावडे, विश्‍वेश नाईक तसेच मंथन नाईक यांनी आपले विचार मांडून मलनिस्सारण प्रकल्पाला विरोध केला. स्वागत व सूत्रसंचालन सदानंद नाईक यांनी केले.

‘महिना पंधरा हजार किंवा रोजगार द्या’

लोकांना चांगले द्यायचे असेल, तर सुदिन ढवळीकर यांनी प्रत्येक कुटुंबाला महिना पंधरा हजार रुपये किंवा औद्योगिक वसाहतीत कायमस्वरूपी नोकरी युवक-युवतींना द्यावी. जर हे सुदिन ढवळीकर यांनी करून दाखवले, तर आपण कायम त्यांच्या सेवेत राहू, असे मनोज परब म्हणाले.

‘झोपडपट्टीला अभय देण्याचे सरकारचे धोरण’

भाजप सरकारकडून गोमंतकीयांच्या घरादारांवर वरवंटा फिरवण्याचा प्रकार सध्या सुरू असून बिगर गोमंतकीयांच्या झोपडपट्टीला अभय देण्याचे धोरण या सरकारने आखले आहे. अशा सरकारला घरी पाठवण्याची आज खरी गरज आहे. तुमचे हित न जपणाऱ्या लोकप्रतिनिधींना त्यांची जागा दाखवायला हवी. दुर्गंधी पसरवणारा हा प्रकल्प उभारून लोकांना बेघर करण्याचा हा प्रकार असून ग्रामस्थांनी एकजुटीने व एकसंध राहून या प्रकल्पाला विरोध करावा. आरजीवाले तुमच्यासोबत राहतील, अशी ग्वाहीही मनोज परब यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT