Socorro Panchayat Election Subhash Halarnkar Dainik Gomantak
गोवा

Socorro Panchayat Election: सुकूर पंचायत प्रभाग १० मधून सुभाष हळर्णकर यांची सरशी

Socorro Panchayat Election: पोटनिवडणुकीत सुभाष हळर्णकर यांनी २२ मतांच्या फरकाने विजय संपादन केला.

गोमन्तक डिजिटल टीम

सुकूर पंचायतीच्या प्रभाग १० मधील पोटनिवडणुकीत सुभाष हळर्णकर यांनी २२ मतांच्या फरकाने विजय संपादन केला. ११ सदस्यीय सुकूर पंचायतीच्या सत्ताधारी गटातील पंचसदस्यांची संख्या आता ९ झाली आहे.

गेल्या रविवारी प्रभाग १०च्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानात ९३० पैकी ६८१ मतदारांनी मतदान केले. त्यात सुभाष हळर्णकर यांना ३२२ तर प्रतिस्पर्धी उमेदवार संजय रेडकर यांना केवळ ३०० मते मिळाली. हेरंब हळर्णकर यांना ४५ तर काजल वाडकर यांना केवळ ९ मते मिळाली.

५ मते बाद ठरविण्यात आली. म्हापसा (Mapusa) मामलेदार कार्यालयात सोमवारी सकाळी मतमोजणी हाती घेण्यात आल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आला. मामलेदार प्रतापराव गावकर यांनी सुभाष हळर्णकर हे विजयी झाल्याची घोषणा केली.

२०१२ पासून विद्यमान पर्यटनमंत्री व स्थानिक आमदार रोहन खंवटे यांच्या सहकार्याने पर्वरी मतदारसंघाचा विकास सुरू आहे. मतदारसंघाच्या विकासाची प्रक्रिया मागील १२ ते १३ वर्षे कोणत्याही जातीधर्माच्या राजकारणाविना केली असून ही कामे यापुढेही अशीच सुरू राहतील, असे विजयानंतर सुभाष हळर्णकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Film On Ram Temple: राम मंदिरावर गोव्यातील कॅथलिक मंत्री बनवणार चित्रपट; 'अयोध्या - द फायनल आर्ग्युमेंट'मधून उलघडणार इतिहास

Goa News Live Updates: पिसुर्ले कुंभारखण येथे दीड किलो गांजासह एकाला अटक, वाळपई पोलिसांची कारवाई

Goa Smuggling: 2 लाखांच्या खैरीच्या लाकडांची तस्करी रोखली! वन अधिकाऱ्यांची कारवाई; धारबांदोड्यात तिघांना घेतले ताब्यात

Vasco Khariwada: खारीवाडा येथे घाऊक मासळी विक्री ठप्प! ग्राहकांत नाराजी; मार्केटातील विक्रेते आक्रमक, पोलिस तैनात

Goa Accidental Death: 192 दिवसांत 143 मृत्‍यू! गोव्यात नेमकं चाललंय काय? 45% बळी युवावर्गाचे

SCROLL FOR NEXT