Goa Cashew Price Dainik Gomantak
गोवा

Cashew Price: काजूउत्पादकांसाठी आनंदाची बातमी! आधारभूत किमतीत 20 रुपयांची वाढ; 4 टनांपर्यंत मिळणार लाभ

Cashew minimum price: आधारभूत किंमत देताना काजूउत्पादन कमाल मर्यादा दोन टन वैयक्तिकरीत्या होती, तर कमाल ५ हेक्टर क्षेत्र सरकारकडून विचारात घेतले जात होते.

Sameer Panditrao

Minimum support price for cashew

पणजी: राज्य सरकारने काजूसाठी किमान आधारभूत (खात्रीशीर) दर १५० रुपये प्रतिकिलोवरून १७० रुपये निश्चित केला आहे. शिवाय १० हेक्टरच्या कमाल क्षेत्राचा विचार करून प्रत्येक शेतकऱ्याला जास्तीत जास्त ४ टनांपर्यंत या योजनेचा लाभ मिळणार आहे. काजूच्या आधारभूत किमतीत २० रुपये प्रतिकिलो वाढवून राज्यातील काजूउत्पादकांना सरकारने दिलासा दिला आहे.

यापूर्वी आधारभूत किंमत देताना काजूउत्पादन कमाल मर्यादा दोन टन वैयक्तिकरीत्या होती, तर कमाल ५ हेक्टर क्षेत्र सरकारकडून विचारात घेतले जात होते. शिवाय, आधारभूत दरामधील फरक म्हणजेच रकमेची कमाल मर्यादा १७० रुपये तर आधारभूत किमतीपेक्षा कमी खरी विक्री किंमत ५० रुपये प्रतिकिलो असेल.

राज्य सरकारने क्षेत्र योजनेत सुधारणा अधिसूचित केली आहे. नारळाच्या समर्थन मूल्यात कोणतीही वाढ करण्‍यात आलेली नाही. म्हणजेच आधारभूत दर ६ रुपये प्रतिनग आहे. तथापि, वैयक्तिक शेतकऱ्याला द्यायची कमाल खात्रीशीर किंमत ३.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. जास्तीत जास्त १० हेक्टर क्षेत्रासाठी १६०० नारळाच्या झाडांसह प्रतिलाभार्थी एक लाख नगांवर लाभ घेऊ शकतो. यापूर्वी ८०० नारळाच्या झाडांसह जास्तीत जास्त५ हेक्टर क्षेत्रासाठी ५० हजार नग असे प्रमाण सरकारने ठरविले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT