Smart City Dainik Gomantak
गोवा

Smart City : राजधानी ‘स्मार्ट सिटी’ वाऱ्यावर; अनेक कामे प्रलंबित

Smart City : उच्च न्यायालयाने ३१ मेपूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सद्य:स्थिती पाहता पणजी ‘स्मार्ट’ होण्यासाठी यंदाचा पावसाळा जावा लागेल अशीच स्थिती आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गंगाराम आवणे

Smart City :

पणजी, राजधानी पणजीत ‘स्मार्ट सिटी’च्या कामांमुळे सर्वत्र अस्ताव्यस्तपणा आला आहे. शहरात कुठेही फिरा, काही ना काही काम सुरू आहे.

उच्च न्यायालयाने ३१ मेपूर्वी स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु सद्य:स्थिती पाहता पणजी ‘स्मार्ट’ होण्यासाठी यंदाचा पावसाळा जावा लागेल अशीच स्थिती आहे.

जेवढ्या जलतगतीने ही कामे व्हायला हवीत तेवढ्या वेगाने ती होत नाही आहेत. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण करताना अनेक समस्या उद्‌भवत आहेत. रस्‍ते खोदून ठेवलेले आहेत. सांडपाणी तसेच इतर कामे प्रलंबित आहेत.

स्मार्ट सिटीची कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणार की पुढील वर्षी हे स्पष्ट करणे गरजेचे आहे. तारखा सांगून लोकांच्‍या डोळ्यांत धूळफेक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या कामांमुळे पणजीकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागतेय.

- उत्पल पर्रीकर

पणजीतील कामे ३१ मेपर्यंत पूर्ण होणे आता शक्य नाही. अतिशय संथगतीने ही कामे सुरू आहेत. शिवाय कामगारही कोठे दिसत नाहीत. ही सगळी परिस्‍थिती लक्षात घेता पुढील केवळ २० दिवसांत कामे पूर्ण होणे अशक्यच आहे. पणजीकरांनी संयम राखावा.

- उदय मडकईकर,

माजी महापौर/विद्यमान नगरसेवक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: लग्नाच्या मांडवात रंगला 'दहीहंडी'चा थरार! वरमाला घालताना नवरदेव-नवरीची कसरत पाहून पाहुणेही चक्रावले, व्हिडिओ तुफान व्हायरल

VIDEO: 8 चौकार, 7 षटकार... IPL 2026 पूर्वी अभिषेक शर्माचा 'रुद्र अवतार', 42 चेंडूत ठोकल्या 94 धावा, पाहा व्हिडिओ

VIDEO: ..अन बघता बघता काजूबागेत आग पसरली! विर्नोडा परिसरात धुराचे साम्राज्य

स्वतःची कविता वाचली, म्हणे गंगेत घोडं न्हालं! कविसंमेलनात कवितेला खरेच महत्त्व उरलेय?

कोकणात जाळपोळ केली, पावसाळ्यात तुर्क माघारी फिरले आणि मराठ्यांनी त्यांना कापून काढले; बहमनी सैन्य 'गोव्या'वर आक्रमण करण्यास निघाले..

SCROLL FOR NEXT