Sanjivani Sugar Factory Dainik Gomantak
गोवा

Sanjivani Sugar Factory:...तर ऊस उत्पादक व कामगारांचा प्रश्न कायमचा सुटणार, सरकारने फसवणूक करु नये; राजेंद्र देसाई

Sanjivani Sugar Factory: सरकार कारखान्याबाबत स्पष्ट धोरण काय ते सांगत नाही, त्यामुळे उस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत, असे देसाई म्हणाले.

गोमन्तक डिजिटल टीम

Sanjivani Sugar Factory

फोंडा: सरकारने ऊस उत्पादकांची फसवणूक करू नये. कारखाना सुरू करण्याची हमी वारंवार सरकारने दिली. इथेनॉल प्रकल्प सुरु करण्यासाठी एका कंपनीने दिलेला प्रस्ताव अजून मंजूर केलेला नाही. इथेनॉल प्रकल्प सुरु झाल्यास ऊस उत्पादक व कामगारांचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.

तसेच त्या कंपनीकडून सरकारला दरवर्षी १ कोटी २५ लाख भाडे मिळणार आहे. त्यामुळे सरकारने कारखाना सुरू करण्याबद्धल धोरण जाहीर करावे, असे ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

संजीवनी सहकारी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सरकारने पाच वर्षाच्या कालावधीसाठी विशेष योजना सुरू केली होती. यंदा शेवटचे वर्ष आहे, जो पर्यंत कारखाना सुरू होत नाही तो पर्यंत सरकारने ऊस उत्पादकसाठी विशेष योजना सुरूच ठेवावी तसेच कारखान्याबाबतही सरकारने स्पष्ट धोरण काय आहे, ते ऊस उत्पादक शेतकऱ्याना सांगावे, अशी मागणीही त्यांनी केली.

देसाई म्हणाले की, सरकार कारखान्याबाबत स्पष्ट धोरण काय ते सांगत नाही, त्यामुळे उस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

मुख्यमंत्र्यांना भेटणार !

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या पाच वर्षासाठी विशेष योजना राबवून आर्थिक सहाय्य दिल्याबद्दल आम्ही गोव्यातील ऊस उत्पादक सर्व शेतकरी सरकारचे आभार मानतो. तसेच कारखाना परत सुरू होईपर्यंत आम्हाला या पुढेही विशेष योजना राबवून अर्थ साहाय्य चालू ठेवावे, या संदर्भात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची लवकरच भेट घेऊन आम्ही निवेदन देणार आहोत, असे राजेंद्र देसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT