Trees fell in nine places Dainik Gomantak
गोवा

भात पीक आडवे: नुकसानीमुळे गोव्यातील शेतकरी वर्ग हवालदिल

नऊ ठिकाणी झाडे पडली: दोन दिवस वादळी पावसाची शक्यता

दैनिक गोमन्तक

पणजी: राज्यात गेल्या आठवडाभर वादळी पावसाने थैमान घातला असून जोराच्या वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्याचा फटका राज्यातील अनेक भागांना बसला. सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या पावसामुळे सात ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून यामुळे घरांचे आणि वाहनांचे नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांनाही तडाखा बसला असून प्रामुख्याने भात आणि मिरची पिकावर याचा परिणाम झाला. पावसामुळे लाखोंचे नुकसान झाले असा अंदाज आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश कृषी संचालकांनी दिलेत.

राज्यात साळावली, अंजूना आणि तिळारी धरणाखाली असलेल्या आणि वर्षभर पाणीपुरवठा असलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भातशेती लागवड होते. सध्या भात पीक काढणीच्या दिवस आहेत. मागील हंगामामधला पाऊस लांबल्यामुळे या वर्षाची भात काढणी मे च्या मध्यापर्यंत चालणार आहे. सध्या 9 हजार हेक्टरवर भात पीक उभे आहे. पावसामुळे या भात पिकावर मोठा परिणाम होत असून भात पीक आडवे पडत आहे. यामुळे या पिकांचे काढणी करताना त्रास वाढत आहे.

का पडतोय पाऊस?

अरबी समुद्रातील आर्द्रता आणि खंडीय प्रदेशात निर्माण होणाऱ्या कडक उष्णतेचे ट्रफ्स यामुळे अनेक ठिकाणी वादळी स्थिती निर्माण होत आहे. यामुळे ढगांचे घर्षण वाढते आणि विजा चमकून अचानक जोरदार वारे वाहण्याबरोबर पावसाला सुरुवात होते. अशी स्थिती सध्या असल्याने पुढील दोन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

पावसासोबत तापमानही वाढले

राज्यातील तापमान 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढले आहे. सोमवारी पणजीत कमाल ३४ व मडगाव येथे 33.5 अंश सेल्सियस एवढ्या तापमानाची नोंद झाली होती. मात्र, मंगळवारी दोन्हीकडील तापमान वाढले. मंगळवारी पणजीत कमाल 35.1 तर मडगाव येथे कमाल 34.8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.

मध्य महाराष्ट्र ते कर्नाटकच्या काही भागांवर आद्रता खाली आल्याने विशेष टर्फ तयार झाला आहे. त्यामुळे सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या उष्ण लाटेमुळे दोन दिवसात तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.-एम.राहुल, हवामान अधिकारी, गोवा वेधशाळ

पावसामुळे पिकांचे नुकसान वाढणार आहे. आम्ही पंचनामा करून आढावा घेण्याच्या सूचना कार्यालयांना दिल्यात. शेतकऱ्यांनीही कृषी खात्याकडे संपर्क साधावा. शेतकरी आधार निधी योजनेनुसार हेक्टरी 40 हजार रुपयांची मदत केली जाऊ शकते. - नेविल अल्फान्सो, संचालक, कृषी खाते

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT