Anmod Ghat Dainik Gomantak
गोवा

Anmod Ghat: रामनगर-अनमोड ब्रिजचे काम वाहतूक बंद न करता करावे; मालवाहतूकदारांची कळकळीची मागणी

Anmod Bridge Work: वाहतूक बंदमुळे सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने येत्या दोन-चार दिवसांत पुन्हा पाहणी करून वाहतूक सुरू ठेवून काम करता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल.

Sameer Panditrao

रामनगर: रामनगर-अनमोड मार्गांवरील ७१ नंबर ब्रिज बनविण्यासाठी काम घेतलेल्या कंत्राटदाराने तीन महिन्यांचा बंद कालावधी हवा असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कळवले आहे. मात्र हा मार्ग तीन महिन्यांसाठी बंद केल्यास या रस्त्याचा वापर करणाऱ्या मालवाहतूकदारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

त्यामुळे हा मार्ग बंद न करता पुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन गोवा लोरी असोसिएशन, रामनगर टिप्पर असोसिएशन, खानापूर व बेळगाव ट्रक असोसिएशन व हुबळी ट्रक असोसिएशनने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले आहे.

याबाबत प्रकल्प संचालक भोणेश कुमार यांनी सांगितले की, आम्हाला हा रस्ता बंद करून काम करायचे नाही, परंतु वन विभागाच्या अडचणीमुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद करून काम करण्याबाबत विचार करण्यात येत होता.

परंतु वाहतूक बंदमुळे सर्वांनाच याचा नाहक त्रास सहन करावा लागणार असल्याने येत्या दोन-चार दिवसांत पुन्हा पाहणी करून वाहतूक सुरू ठेवून काम करता येईल का, याची चाचपणी करण्यात येईल. महामार्ग प्राधिकरण, कंत्राटदार व मालवाहतूकदार यांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढण्यात येईल, असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT