Vasco  Dainik Gomantak
गोवा

Vasco News: सर्वत्र खड्डेच खड्डे; रस्ते विभागाकडून मलमपट्टीवर भर

Goa Roads: यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा व्यव‌स्थित होत नाही

गोमन्तक डिजिटल टीम

मुसळधार पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला असून काही रस्ते पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान येथील काही रस्ते खड्ड्यांत हरवले दिसत आहेत. आमदार कृष्णा साळकर यांनी याविषयी विधानसभेत आवाज उठविल्यानंतर सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाकडून खड्डे बुजवायला सुरुवात केली आहे.

गेले १५ दिवस पावसाने थैमान घातले आहे. यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडल्याने पाण्याचा निचरा व्यव‌स्थित होत नाही. त्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर साचून राहते. दरम्यान पाणी रस्त्यावर साचून राहत असल्याने रस्त्यांना खड्डे पडले आहेत. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर यांनी पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांचे हॉट मिक्स करून घेतले होते. त्यामुळे यंदा पावसात रस्त्यांची तितकी चाळण झाली नाही. किरकोळ अपवाद सोडला तर शहरात रस्ते अजून सुस्थितीत आहेत. फक्त स्वतंत्रपथ मार्गावरील काही भाग उखडलेला आहे.

विधानसभेत आवाज

गोवा शिपयार्ड समोरील रस्ता वारंवार खचत होता, यावर वारंवार तात्पुरती उपाययोजना करून हा रस्ता पुर्ववत करण्यात येत होता. आमदार कृष्णा साळकर यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर सार्वजनिक बांधकाम रस्ते विभागाला आज खडबडून जाग आल्याने भर पावसात यावर तात्पुरते आवरण ओढले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT