Outraged youth of Bhandari community Dainik Gomantak
गोवा

राजकीय वक्तव्ये केल्याने भंडारी समाजामध्ये संतापाची लाट

समाजाला गृहीत धरून पदाधिकारी जे वक्तव्ये करत आहेत, त्याला या समाजातील युवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: गोमंतक भंडारी समाजाच्या कार्यकारी समितीने ज्ञातीबांधवांना विश्‍वासात न घेताच राजकीय वक्तव्ये केल्याने समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे. समाजाला गृहीत धरून पदाधिकारी जे वक्तव्ये करत आहेत, त्याला या समाजातील युवकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. यामुळे या समाजातील दुही चव्हाट्यावर आली आहे.

या समितीने समाजाचा राजकीय लिलाव चालविल्याचा आरोप त्यांनी केला आहे. समाजामध्ये राजकारण आणू नये. या समाजाच्या नेत्यांनी निवडणूक लढविणे व त्यांनी इतरांना पाठिंबा देणे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्‍न असल्याने समितीने त्यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा दिला आहे. या मुद्यावरून रिव्होल्युशनरी गोवन्स संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला असून आम आदमी पक्षापासून गोमंतकीयांनी सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. हल्लीच समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांनी जो राजकीय पक्ष समाजाच्या अधिकाधिक नेत्यांना उमेदवारी देईल, त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी आम आदमी पक्षाने भंडारी समाजाचा मुख्यमंत्री तर ख्रिस्ती धर्मीय उपमुख्यमंत्री असेल, अशी घोषणा केली.

या घटनेनंतर भंडारी समाजाचे ज्ञातीबांधव आणि युवकांमध्ये संतापाची लाट उसळली असून कार्यकारी समितीने समाजाचा राजकीय लिलाव करून राजकारण्यांकडून मलई मिळवण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप होत आहे.

विकासाचा अजेंडा घेऊन गोव्यात आलेल्या दिल्लीच्या ‘आप’ने आता धर्माबरोबर समाजात जातीय तेढ निर्माण केले असून ते गोव्यासाठी घातक आहे. ‘आप’ने मुख्यमंत्री पदासाठी भंडारी समाजाचा तर उपमुख्यमंत्री पदासाठी ख्रिस्ती धर्माच्या व्यक्तीची निवड करण्याची केलेली घोषणा गोव्यासाठी मारक आहे. त्यामुळे ‘आप’पासून लोकांनी सावध राहावे.

- मनोज परब, संयोजक, रिव्होल्युशनरी गोवन्स

समितीमागे राजकीय सूत्रधार

या समाजाच्या नोंदणीचे प्रकरण सध्या जिल्हा निबंधकांकडे प्रलंबित आहे. त्यांनी ते कायदा खात्याकडे पाठविले आहे. या समाजाचे शेड्युल तसेच ऑडिट अपूर्ण आहे. ऑडिट अहवाल पुराव्यासह तयार केला असा दावा समितीने केला असल्यास त्यावर चर्चा करण्याचे आव्हान ॲड. बकाल यांनी दिले आहे. समाजासमोर खोटी माहिती सादर करून दिशाभूल करू नये. या समितीने समाजामध्ये फूट पाडण्याचे तसेच इतर जातींमध्ये अंतर तयार केले आहे. त्यांनी अशा घोषणा करणे लगेच थांबवावे. या समितीमागे राजकीय सूत्रधार आहेत. समाजाला राजकारणात लोटून हे पदाधिकारी समाजाचे नाव बदनाम करत आहेत, असा आरोप बकाल यांनी केला.

अशोक नाईक यांच्यात सरपंच निवडून आणण्याचीही कुवत नाही : अातीश मांद्रेकर

समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्यात समाजाला पुढे नेण्याची क्षमता नाही. राज्यात सुमारे 60 टक्के समाजाचे लोक आहेत तर ते अधिकाधिक ज्ञातीबांधवांची नोंदणी का करू शकले नाहीत? राज्यात सरपंच निवडून आणण्याचीही त्यांची कुवत नाही. नवीन सदस्यनोंदणी सध्या बंद ठेवली आहे. ऑडिट अहवाल तयार केला असेल तर तो चर्चेसाठी ठेवावा, असे आतीश मांद्रेकर म्हणाले.

दस्तऐवज कोणी हरवले?

ॲड. अनिश बकाल म्हणाले की, गोमंतक भंडारी समाजाची कार्यकारी समितीची मुदत संपून गेली आहे. या समाजाचे नोंदणीचे नूतनीकरण अजून केलेले नाही. नोंदणी दस्ताऐवज हरवल्याची तक्रार आजी व माजी कार्यकारी समितीने पोलिसांत नोंदवली आहे. समाजाच्या नोंदणीचे दस्ताऐवज कोणी हरवले हा प्रश्‍नही उपस्थित होत आहे. या समितीने गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत (2018-20) मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व घोळ घातला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda By Election: फोंड्यात निवडणुकीचे पडघम! दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला; कोणाची लागणार लॉटरी?

Birch By Romeo Lane Case: 'बर्च बाय रोमियो लेन' प्रकरणात ॲड. रोहित ब्रास-डिसांचा राजीनामा; न्यायाधीशांवर केले गंभीर आरोप

Goa Govrnment Jobs: सरकारी नोकरीचे स्वप्न होणार पूर्ण! विधानसभा निवडणुकीआधी नोकऱ्यांचा पाऊस; मुख्यमंत्र्यांचा मास्टरस्ट्रोक

सॅम्युअल मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिस अधीक्षकांनी नोंदवले ब्रागांझा कुटुंबीयांचे जबाव, पोलिसांच्या कारवाईवर आमदार फेरेरांचे आक्षेप

Mala Lake Fish Death: मळा तलावातील माशांचा रहस्यमय मृत्यू! उच्च न्यायालयाच्या तडाख्यानंतर 32 घरांना बसला सांडपाणी जोडणीचा वेढा

SCROLL FOR NEXT