Verna accident dainik gomantak
गोवा

Goa Accident: धक्कादायक! वेर्णा येथे भरधाव टॅक्सीने युवकाला उडवलं

आग्नेल आश्रम सर्कलजवळ घडला अपघात

गोमन्तक डिजिटल टीम

मडगाव: वेर्णा येथे भरधाव टॅक्सीने जोराची धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेला युवक हा 27 वर्षाचा असून, तो झुआरी नगर येथील काम संपल्यानंतर घरी परतत असताना हा अपघात झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

(One killed after hit by a speeding taxi at Verna)

मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी 6 च्या सुमारास सां. जुजे द आरीयल येथे राहणारा आकाश गौडा ( 27 वय ) हा जुवारी नगर येथील काम संपवल्यानंतर घरी जात होता. दरम्यान वेर्णा येथील आग्नेल आश्रम जवळील वळणावर आल्यानंतर नुवेहून कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सीने गौडाला धडक दिली. यात गौडाचा मृत्यू झाला आहे.

वेर्णा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत गौडा ( 27 वय ) हा जुवारी नगर येथे काम करत होता. काम संपवत दुचाकीने घरी जात असताना वेर्णा आग्नेल आश्रम सर्कलजवळ कुठ्ठाळीच्या दिशेने जाणाऱ्या काळ्या पिवळ्या टॅक्सीने त्याला धडक दिली. यातच गौडा त्याचा मृत्यू झाला आहे.

अपघातानंतर काही वेळातच जखमी गौडा याला मडगाव जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करत असताना त्याचे निधन झाले. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, धडक देणारी टॅक्सी ही काणकोण येथील दामोदर नाईक हा चालवीत होता. मात्र 27 व्या वर्षी अपघातात युवक दगावल्याची माहिती मिळताच परिसरात शोक व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT