NSUI Goa Dainik Gomantak
गोवा

RSSची विचारसरणी शिक्षण व्यवस्थेत आणण्याची मोदी सरकारची तयारी : एनएसयूआय

भाजप भारताची लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष व्यवस्था संपवत आहे

गोमन्तक डिजिटल टीम

NSUI Goa : नरेंद्र मोदी सरकार शिक्षण व्यवस्थेत ढवळाढवळ करत आहे. तसेच लोकशाही आणि राष्ट्रीय संघर्षाचे अध्याय हटवून आरएसएसची विचारधारा जोडत असल्याचा आरोप एनएसयूआय गोवा विभागाने केला आहे. एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.

एनसीईआरटीमधून लोकशाही आणि विविधतेचे अध्याय वगळण्यात आले आहेत. लोकप्रिय संघर्ष चळवळी आणि लोकशाही अध्यायांपुढील आव्हानेही वगळण्यात आली आहेत. जेव्हा हे महत्त्वाचे अध्याय वगळले जातात तेव्हा आपल्या देशाची मुले काय शिकणार आहेत,” असा प्रश्नही त्यांनी केला.

नौशाद चौधरी म्हणाले की, "इयत्ता नववीच्या सामाजिक शास्त्राच्या पाठ्यपुस्तकातील महत्वाचे अध्याय एनसीईआरटीने काढले आहेत. संसदेत विरोधकांचे माईक बंद करून विरोधकांचा आवाज कसा दाबला जातो तसेच भाजप आणि मोदी सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही हे त्यांनी दाखविले आहे."

"आता पहिल्यांदा मतदान करायला जाणाऱ्या मतदारालाही इतिहासाची माहिती न मिळावी यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत,” असे चौधरी म्हणाले.

"भाजप सरकारने केलेली शिक्षणाची सध्याची व्यवस्था विद्यार्थ्यांना लोकशाहीचे पैलू जाणून घेण्यापासून वंचित करेल. ते महात्मा गांधी, बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरू यांचा इतिहास पुसून टाकत आहेत आणि देशासाठी काहीही न करणाऱ्या विनायक दामोदर सावरकरांचे अध्याय जोडत असल्याचा आरोप यावेळी केला.

स्वातंत्र्यलढ्यात आरएसएस आणि भाजपचे काहीच योगदान नव्हते. भाजप हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या नावावर जातीय राजकारण खेळत आहे. मोदी सरकार अल्पसंख्याकांना महत्त्व देत नसल्यामुळे मौलाना आझाद यांच्या नावाची शिष्यवृत्ती बंद केली आहे असे चौधरी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

GT vs RR IPL 2026 Qualifier 2: गुजरात की राजस्थान? पावसामुळे सामना रद्द झाल्यास फायनलचं तिकीट कुणाला? पाहा काय सांगतो IPL चा नियम

Monsoon Update: मान्सून उशिरा येणार, पण गोव्यात मान्सूनपूर्व पावसाची बॅटिंग सुरूच राहणार

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा झटका! 8व्या वेतन आयोगाला उशीर; होणार लाखोंचे नुकसान, 'हे' आहे कारण

Tata Tiago 2026: 6 एअरबॅग्ज अन् 15 वर्षांची बॅटरी गॅरंटी; टाटाने अवघ्या 5 लाखांत आणली मिडिल क्लाससाठी बेस्ट कार, मिळतील 'हे' दमदार फीचर्स

Goa Politics: निवडणुकीत चुचकारायचे, नंतर विसरायचे! गोव्यात गेल्या 40 वर्षांपासून मराठी भाषेबाबत खेळलं जातंय घाणेरडं राजकारण!

SCROLL FOR NEXT