Rice Farming Canva
गोवा

Goa Monsoon: नको रे बाबा पाऊस! सासष्टीत अतिवृष्टीमुळे भातपिकाची नासाडी; शेतकरी चिंतातुर

गोमन्तक डिजिटल टीम

Rice Farming Destroyed Due To Heavy Rain At Salcete Goa

सासष्टी: गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सासष्टीतील शेतकरी चिंतातूर झाले असून नव्याने लागवड केलेल्या भातपिकाची नासाडी झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. पावसाळ्याच्या सुरवातीला पावसाची वाट पाहणारे शेतकरी आता पाऊस नको रे बाबा, असे म्हणत आहेत.

जून महिन्यामध्ये या शेतकऱ्यांनी भातशेतीची लागवड केली होती. पण नंतर जुलै व ऑगस्टमध्ये पडलेल्या पावसामुळे ही भातशेती नष्ट झाली. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा व साधनांचा वापर करून परत एकदा भातशेतीची लागवड केली. पण आता भाताची कणसे वर आलेली असताना आलेल्या या पावसामुळे परत एकदा त्यांचे प्रयत्न असफल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

आता या शेतकऱ्यांसमोर कृषी खात्याकडे धाव घेण्यापलीकडे दुसरा पर्याय नाही. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी आधी नुकसान भरपाईसाठी अर्ज केले आहेत, त्यांचे अर्ज निकालात काढण्यात आले आहेत, असे सासष्टीतील (Salcete) विभागीय कृषी अधिकारी शरीफ फुर्तादो यांचे म्हणणे आहे.

शेतातील पाण्याची पातळी वाढली

सतत पाऊस पडत असल्यामुळे गेल्या दोन दिवसांत शेतातील पाण्याची पातळी वाढली आहे. पहिल्या पावसात ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांनी परत एकदा शेतीची लागवड केली होती. मात्र, परत पडलेल्या पावसामुळे आमच्यासारख्या शेतकऱ्यांचे स्वप्न साकार होणे कठीण आहे, असे कुडतरीचे शेतकरी जे. सांतान रॉड्रिग्स यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mopa Airport: ‘मोपा’मुळे दक्षिणेतील पर्यटनाचा विचका; व्‍यवसाय घटल्याने व्‍यावसायिक चिंतेत

Goa Tourism: परदेशी पावलं गोव्याच्या दिशेने वळणार; यंदा विदेशी पर्यटकांची संख्या वाढणार

Pitrupaksha 2024: श्राद्ध आणि महालय यात फरक आहे का? सर्वपित्री अमावस्या म्हणजे काय?

Ponda Crime: संसार सोडून 'त्या' दोघी गोव्यात, कारमधून आलेल्या तरुणांनी केलं अपहरण; तपासात उघड झाला चक्रावून टाकणारा घटनाक्रम

Goa Tourism: परदेशी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सरकारचं खास प्लॅनिंग; कोविड नंतर आकड्यात झालीये का वाढ?

SCROLL FOR NEXT