Nepali youth arrested for abducting girl Dainik Gomantak
गोवा

मुलीचे अपहरण केल्‍याप्रकरणी नेपाळच्या युवकाला अटक

सदर मुलगी 11 जूनपासून आपल्या घरातून बेपत्ता होती.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: थिवी परिसरातील एका मुलीला फूस लावून पळवून नेल्‍याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी 25 वर्षीय मूळ नेपाळच्या युवकाला नाशिक येथून अटक केली आहे. सदर मुलगी 11 जूनपासून आपल्या घरातून बेपत्ता होती.

(Nepali youth arrested for abducting girl)

कोलवाळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू अनिल सुनार (रा. आकय-म्हापसा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या मोठ्या बहिणीने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. तक्रारीत तिने म्हटले होते की, आपल्‍या बहिणीचे एका अनोळखी व्यक्तीने अपहरण केले असून तिला अज्ञात जागी ठेवले आहे. त्यानुसार पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

पोलिसांना तपासावेळी या पीडित बेपत्ता अपहरण मुलीचे मोबाईल लोकेशन हे नाशिक-महाराष्ट्रात दाखवत होते. जे अंबाड पोलिस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात येते. तेथू जाऊन पोलिसांनी संशयिताला अटक केली. तसेच मुलीची सुटका केली. या दोघांनाही गोव्यात आणण्‍यात आले आहे. या प्रकरणी संशयिताला अटक करण्‍यात आली आहे.

उपनिरीक्षक सोनम वेर्णेकर, हेड कॉन्स्टेबल अजय गावकर, रामा नाईक, सुधीर परब, कॉन्स्टेबल सुलेश नाईक, राजीव नाईक यांनी तपास कामात सहभाग घेतला. त्यांना पोलिस अधीक्षक शोबित सक्सेना, उपअधीक्षक जिवबा दळवी व पोलिस निरीक्षक सोमनाथ माजिक यांचे मार्गदर्शन लाभले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT