Mobile phone thieves nabbed by Calangute police Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News : पर्यटकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा परप्रांतीयांना अटक

कळंगुट पोलिसांची कारवाई

Rajat Sawant

पर्यटकांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना अटक करण्यात कळंगुट पोलिसांना यश आले आहे. या कारवाईत झारखंड, आसाम येथील संशयितांकडून 1 लाख 30 हजार रुपयांचे 11 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून कळंगुट पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिसांनी बागा कळंगुट परिसरातून दोन संशयित व्यक्तींना पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता संशय आल्याने त्यांची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी संशयितांकडे विविध ब्रँडचे 11 मोबाईल फोन सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या मोबाईल फोन्सची बाजारातील मूल्य 1 लाख 30 हजार रुपये एवढे आहे.

संशयितांची चौकशी केली असता संशयितांनी बागा समुद्रकिना-यावरून सदर फोन चोरी केल्याचे उघड केले. याप्रकरणी कळंगुट पोलिसांनी सूरज रविदास (27, रा. बार्देझ, मूळ, झारखंड) व सनी हुसैन दुल (29, मूळ. आसाम) या संशयितांना अटक केली आहे. ही कारवाई हेड कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर, पोलिस कॉन्स्टेबल अमीर गरड, प्रवीण चोडणकर यांनी केली.

प्रकरणाचा पुढील तपास कळंगुट पोलीस स्टेशनचे पीएसआय रमेश हरिजन, पीआय परेश जी नाईक आणि एसडीपीओ पर्वरी विश्वेश व्ही कर्पे यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT