मांद्रे: वीज विभागाने विभागाने केल्या काही घेतलेल्या उपक्रमांमुळे राज्यात ठिकठिकाणी रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे, पावसात ही स्थिती आणखीन वाईट झाली आहे. इतर ठिकाणांप्रमाणे मांद्रे मतदारसंघातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन आमदार जीत आरोलकर यांनी जनतेची जाहीर माफी मागितली. रस्त्यांच्या या दुर्दशेमागे अनेक कारणे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिवाळीनंतर हे सर्व रड्डे 'हॉट मिक्स डांबरीकरण' करून पुन्हा सुस्थितीत आणले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.
आमदार आरोलकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, मांद्रे मतदारसंघातील रस्ते खराब होण्यामागे विकासाची कामेच मुख्य कारण आहेत. जनतेला चांगल्या मूलभूत सुविधा देण्यासाठी भूमिगत वीज केबल टाकणे आणि नवीन जलवाहिन्या बसवणे आवश्यक होते.
या कामांसाठी अनेक ठिकाणी रस्ते खोदावे लागले, ज्यामुळे त्यांची अवस्था खराब झाली आहे. जनतेलाही ही कारणे माहीत आहेत, असे त्यांनी सांगितले.
खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. दिवाळीचा सण संपल्यानंतर खराब झालेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती युद्धपातळीवर केली जाईल आणि त्यांना पुन्हा डांबरीकरण करून वाहतुकीसाठी योग्य बनवले जाईल, असे आश्वासन आरोलकर यांनी दिले. तोपर्यंत नागरिकांनी या परिस्थितीकडे समजून घ्यावे आणि सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.