Panaji Smart City Pramod Yadav
गोवा

Panaji Traffic Issue: पणजीतून प्रवास करताय? 'या' महत्वाच्या मार्गावर '35' दिवसांसाठी केलाय वाहतूक बदल

Pramod Yadav

Panaji Smart City Traffic Issue: राजधानी पणजीत मागील अनेक दिवसांपासून स्मार्ट सिटीची कामे सुरू आहेत. शहरात अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहेत, त्यामुळे वाहतुकीसाठी अडढळा निर्माण होत आहे.

दरम्यान, जवळ येत असलेला पावसाळा आणि G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्मार्ट सिटीच्या कामांना वेग आला आहे. सध्या सांतीनेज परिसरात विविध कामे सुरू असल्याने या मार्गावरील वाहतुकीत महत्वाचा बदल करण्यात आला आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हागे यांनी याबाबत आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार ताज विवान्ता जंक्शन पासून काकुलो मॉल या मार्गावर एकेरी वाहतूक असणार आहे.

या मार्गावर सध्या भूमीगत पाईपलाईन टाकण्यासह विविध केबलिंगचे काम सुरू आहे. त्यासाठी मार्गावर अनेक ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे.

एकेरी वाहतुकीचा आदेश मे महिन्याच्या 15 तारखेपर्यंत राहणार आहे. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांनी या बदलाची नोंद घ्यावी अशी सूचना करण्यात आली आहे.

वाहतूक कोंडी होणार?

ताज विवान्ता जंक्शन ते काकुलो मॉल हा सांतीनेज परिसरातील एक प्रमुख आणि वाहनांची अधिक वर्दळ असणारा मार्ग आहे. दरम्यान, मार्गावर एकेरी वाहतूक केल्यानंतर मिरामार रस्त्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

तसेच, पुढे अटल सेतुमुळे देखील वाहतूक कोंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रवासाचे नियोजन करावे लागणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: ख्रिस्ती समाजाच्या मोर्चाचा वाहतुकीला फटका; अनेकांची गैरसोय

Saint Francis Xavier: संत फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांच्या DNA चाचणी मागणीवरून गोव्यात वाद का पेटला?

Goa Crime: लग्नाचे आमिष देवून अत्याचार करणाऱ्या ओडिशातील तरुणाचा कोर्टाने फेटाळला जामीन!

गोव्यात गेल्या दहा वर्षात सर्वाधिक 'वृक्षसंहार', शेतजमिनींचादेखील ऱ्हास; केंद्रीय अहवालातून खुलासा!

SCROLL FOR NEXT