Farming in Goa Dainik Gomantak
गोवा

अवकाळी पावसामुळे निम्मं पिक मातीत, बागायतदार हवालदिल

दैनिक गोमन्तक

पणजी : गोव्यात अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. यासोबतच काजू, आंबे, फणस आदी पिकांनाही पावसाची झळ बसली आहे. जवळपास निम्म्याहून अधिक पिक पाण्यात गेलं असून सरकारने मदतीचा हात देण्याची मागणी आता शेतकऱ्यांमधून होताना दिसत आहे. आंबा, काजू पिकांचं नुकसान झाल्याने त्यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. (Farming in Goa News Updates)

गोव्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे जवळपास हातातोंडाशी आलेल्या निम्म्या पिकाचं नुकसान झालं आहे. मोहोर झडून गेला असून, आंबा काजू पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे आंबे पडून नुकसान झालं आहे, तर काही ठिकाणी पावसामुळे आंब्यावर काळे डाग पडल्याने पिक धोक्यात आलं आहे.

गोव्यात (Goa) उन्हाळी पिकंही मोठ्या प्रमाणात घेतली जातात. पावसामुळे ही पिकंही मातीमोल झाल्याचं चित्र आहे. सासष्टीतील मायणा, कुडतरी, बेताळबाटी, चांदरसारख्या भागात शेतकऱ्यांचं सर्वाधिक नुकसान झालं आहे. अवकाळी पावसासह वेगवान वादळी वाऱ्यांमुळे बागायती पिकांचं नुकसान झालं आहे. कोरोना (Corona) लॉकडाऊननंतर बागायतदार शेतकऱ्यांना चांगल्या पिकाची अपेक्षा होती, मात्र पावसाने हाताशी आलेलं पीक नेल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. काही ठिकाणी पिकांची लागवड लवकर करण्यात आली होती, त्याठिकाणच्या पिकाचं नुकसान कमी झाल्याचं कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT