Mandur Dangerous Wall Dainik Gomantak
गोवा

Mandur News: मंडूर परिसरातील धोकादायक घरे, कुंपणे हटविण्याची मागणी

Mandur Panchayat: परिसरातील जीर्ण किंवा कमकुवत झालेल्या वास्तू ओळखून जीवितहानी होणार नाही याची खात्री पंचायतीने केली पाहिजे

गोमन्तक डिजिटल टीम

तिसवाडी: मंडूर येथे हल्लीच घराची भिंत कोसळून आई-मुलाचा मृत्यू झाला होता. आजोशी-मंडूर परिसरात अनेक ठिकाणी जीर्ण झालेली घरे आणि कुंपणे आहेत. रस्त्याच्या बाजूला असलेली धोकादायक घरे, कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. ही धोकादायक घरे हटविण्याची स्थानिकांची मागणी आहे.

आजोशी परिसरात रस्त्याच्या बाजूला एका घराची भिंत कोसळून माती आणि दगड रस्त्यावर आले असून संपूर्ण घर कोसळल्यास वाहतुकीवर याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण घर रस्त्याच्या बाजूला आहे. जुने गोवा-पिलार मुख्य जिल्हा रस्ता असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक होते.

त्यामुळे या ठिकाणी अपघाताची शक्यता आहे. आजोशी येथे एका जुन्या घराचे कुंपण पूर्णता जीर्ण अवस्थेत आहे, त्याचा काही भाग कोसळला होता, इतर ठिकाणी देखील भेगा गेल्याने ते कधीही हे कुंपण कोसळण्याची शक्यता आहे.

परिसरातील जीर्ण किंवा कमकुवत झालेल्या वास्तू ओळखून जीवितहानी होणार नाही, याची खात्री पंचायतीने केली पाहिजे, अशी प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त केली जात आहे.

धाकादायक आणि जीर्ण अवस्थेत असलेल्या वास्तू ओळखण्याचे काम अजून हाती घेतलेले नाही. काही ठिकाणी रस्त्याच्या बाजूला जीर्ण स्थितीतील घरे आणि कुंपण मालकांना आम्ही लवकरच नोटीस बजावणार आहोत.
प्रशांत नाईक, सरपंच, मंडूर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT