Kadamba Transport Dainik Gomantak
गोवा

Kadamba Transport Corporation : आता कदंब बस ट्रॅक करा ऑनलाईन, अ‍ॅपमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार

कदंबच्या ‘लाईव्ह बस ट्रॅक अॅप’चा आजपासून प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यास सुरुवात

गोमन्तक डिजिटल टीम

Kadamba Bus Live Tracking App : आता कदंबाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होणार आहे. कदंब महामंडळाने ‘लाईव्ह बस ट्रॅक अ‍ॅप’ लाँच केले असून आजपासून त्याचा प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुढील 15 दिवस वापर करण्यात येणार असून 1 ऑग्स्टपासून या अ‍ॅपची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

काही महिन्यांपूर्वी कदंब महामंडळाने ‘लाईव्ह बस ट्रॅक अ‍ॅप’ सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. या अ‍ॅपच्या मदतीने प्रवाशांना कदंबा बसचे लोकेशन मिळण्यास मदत होणार आहे. 'या अ‍ॅपमुळे नागरिकांच्या कदंब प्रवासासंदर्भातील अनेक समस्या सुटतील', असा विश्वास कदंबा महामंडळाने व्यक्त केला.   

महामंडळाला हे अ‍ॅप बंगळुरु येथील रोमन टेक्नॉलॉजी या कंपनीने​ मोफत तयार करून दिलेले आहे. १५ जुलैपासून हे अॅप प्रायोगिक तत्त्वावर वापर करण्यास सुरुवात करण्यात आले असून पुढील पंधरा दिवस नियंत्रण ठेवून आणि त्रुटी दूर करून 1 ऑगस्टपासून अ‍ॅपची सर्वच प्रवाशांसाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT