शेतकरी संघटनेनं आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात कमी प्रतिसाद  Dainik Gomantak
गोवा

शेतकरी संघटनेनं आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात कमी प्रतिसाद

देशातील शेतकरी संघटना व कामगार संघटना यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला गोव्यात (Goa) प्रतिसाद मिळाला नाही.

दैनिक गोमन्तक

पणजी: देशातील (country's) शेतकरी संघटना व कामगार संघटना (farmers' unions and trade unions) यांनी आपल्या विविध मागण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदाला (Bharat Banda) गोव्यात (Goa) प्रतिसाद मिळाला नाही. गोव्यात आयटक या कामगार संघटनने गोव्यात भारत बंदला पाठिंबा देण्याचे आवाहन केले होते. स्वत: आयटकने काही ठिकाणी औद्योगीक वसाहतीच्या बाहेर व काही खाण कंपण्याच्या बाहेर कामगारांंना घेऊन निदर्शने केली तेवढेच.

मात्र राज्यातील पणजीसह इतर सर्वच शहरातील जनजिवन सुरळीत सुरु होते. दुकाने बंद नव्हती, की बाजार बंद नव्हते. कुठेही रस्त्यावर वर्दळ कमी झालेली नव्हती. सर्व बॅंकाचे व सरकारी कार्यालयाचे व्यावहार सुरळीत सुरु होते. बस वाहतूक व टॅक्सी वाहतूकही सुरु होती. औद्योगीक वसाहतीतील उद्योगही सुरु होते.

दरम्यान बॅंक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुभाष नाईक जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बॅंकांनी कामकाज बंद ठेवले नाही. बॅंका सुरु होत्या. मात्र बॅंक कर्मचारी संघटनेचा भारत बंदला नैतीक पाठिबा होता. अशी माहिती नाईक जॉर्ज यांनी दिली.

30 रोजी महामेळावा व धरणे

भारत बंद आंदोलनाचा भाग म्हणून आयटकद्वारे ३० सप्टेंबर रोजी पणजी येथील आझाद मैदानावर सकाळी 10 वाजल्यापसून कामगार महामेळावा व धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT