Konkan Railways

 

Dainik Gomantak

गोवा

कोकण रेल्‍वेचे ‍विद्युतीकरण मार्च महिन्‍यापर्यंत पूर्णत्वास

95 टक्के काम पूर्ण : प्रदूषणविरहीत सेवेचे बोर्डाकडून लक्ष्‍य

दैनिक गोमन्तक

फातोर्डा : कोकण रेल्वेच्या गोव्यातील मार्गाचे विद्युतीकरण 95 टक्के पूर्ण झाले आहे. पेडणेपासून लोलयेपर्यंत आलेल्या 103 कि.मी. अंतर कामावर अंतिम हात फिरविण्यात येत आहे. हा प्रकल्प मार्च 2022 मध्ये पूर्ण होणार असल्याने गोमंतकीयांना विजेवर चालणाऱ्या प्रदूषणविरहीत रेल्‍वेने प्रवास करण्याची संधी मिळणार आहे.

कोकण रेल्वेतर्फे (Konkan Railways) महाराष्ट्र ते कर्नाटक पर्यंत 743 कि.मी. अंतर मार्गाचे पूर्णतः विद्युतीकरण करण्यात येणार असून महाराष्‍ट्रातील (Maharashtra) रत्नागिरीपासून गोव्यातील वेर्णापर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्‍याबाबत रेल्‍वे अधिकाऱ्यांनी सुरक्षेबाबत चाचणी केली आहे. त्‍यांनी रेल्वे विद्युतीकरणाला हिरवा कंदीलही दाखविण्यात आला आहे.

वेर्णापासून गोव्यातील दक्षिण सीमेलगत असलेल्या लोलयेपर्यंतच्या आणि कर्नाटकातील (Karnataka) कारवार रेल्वे स्टेशन मार्गावरील रुळावरील विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

कर्नाटकमधील ठोकूर रेल्वे स्‍थानक ते कारवार पर्यंतचे आणि महाराष्ट्रातील रोहा ते रत्नागिरी रेल्वे स्‍थानकापर्यंतचे काम पूर्ण झाले आहे. या रेल्वे मार्गाला कमिशनर रेल्वे सेफ्टीतर्फे सहमती मिळाली आहे. गोव्‍यासह (Goa) महाराष्‍ट्र आणि कर्नाटक मिळून 743 कि.मी. अंतराच्‍या या प्रकल्पाच्या कामाचा अंदाजे खर्च 1100 कोटी रुपये असा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संतापजनक! सिंधुदुर्गात नदीत आंघोळ करणाऱ्या ओंकार हत्तीवर फेकले सुतळी बॉम्ब आणि फटाके Watch Video

Goa Today's News Live: 'कृषी विभूषण' शेतकरीच बसला आंदोलनाला !

National Security Act: 'सत्ताधारी पक्ष गोवा संपवायला निघालेत'! चोडणकरांचा आरोपच ‘रासुका’ दबाव आणण्यासाठी लागू केल्याचा दावा

Vande Mataram 150th Anniversary: ‘विकसित भारत 2047 ’च्या स्वप्नासाठी जगा', CM सावंतांचे तरुणांना आवाहन; ‘वंदे मातरम्’ स्मरणोत्सव साजरा

'गोवा गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान, नागरिकांसाठी मात्र असुरक्षित', LOP युरींचे टीकास्त्र; कायदा व सुव्यवस्था विषयावर अधिवेशन बोलवण्याची मागणी

SCROLL FOR NEXT