Kiran Kandolkar Dainik Gomantak
गोवा

किरण कांदोळकर तृणमूल काँग्रेस सोडणार

पक्षाची फेररचना होण्यापूर्वीच पडझड, 14 पंचसदस्यांनी दिला सदस्यत्वाचा राजीनामा

दैनिक गोमन्तक

पणजी: विधानसभा निवडणुकीत फारसा परिणाम पाडू न शकलेल्‍या तृणमूल काँग्रेसला निवडणुकीनंतर लागलेली गळती अद्यापही सुरूच आहे. आता पक्षाच्‍या थिवी मतदारसंघातील उमेदवार आणि जिल्‍हा पंचायत सदस्‍य कविता कांदोळकर यांनी पक्षावर नाराजी व्‍यक्त करीत सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे. परवा काँग्रेसच्‍या चेतना यात्रेतील बैठकीत काणकोणचे उमेदवार हजर झाल्‍याने लोकांना भुवया उंचावल्‍या होत्‍या. कांदोळकर यांच्‍यासह थिवी, अस्‍नोडा, रेवोडा आणि कामुर्लीच्‍या सरपंचांसह इतर चार उपसरपंच तसेच 14 पंचसदस्‍यांनीही तृणमूलच्‍या प्राथमिक सदस्‍यत्‍वाचा राजीनामा दिला आहे.

कांदोळकर यांच्‍यासह समर्थकांनी दिलेल्‍या राजीनाम्‍यामुळे पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे पक्षाची फेररचना करणार असल्याची माहिती पक्षाकडून देण्यात आली असली तरी पक्षाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी अद्यापही पक्ष सोडला नाही, मात्र ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

कविता कांदोळकर यांनी पक्षाची कामगिरी आणि सध्‍याच्‍या कार्याला कंटाळून राजीनामा दिला आहे. सुरुवातीला जोमाने पक्षात आलेल्या अनेकांनी निवडणुकीदरम्यान आणि निवडणुकीनंतर पक्षाला रामराम ठोकत इतर पक्षाजवळ केले होते आहेत आता कविता कांदोळकर यांच्यामुळे पक्षाला झालेली पडझड मोठी मानण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT