Nilesh Cabral
Nilesh Cabral Danik Gomantak
गोवा

काणकोण महामार्ग दुरुस्ती, निर्णय 30 पर्यंत : काब्राल

दैनिक गोमन्तक

सासष्टी : काणकोण तालुक्यातील करमल घाट ते मनोहर पर्रीकर बगलरस्त्यापर्यंतचा राष्ट्रीय महामार्ग 66चा भाग अपघातग्रस्त असल्याने त्याची दुरुस्ती व विस्तारीकरण करण्याची किंवा डोंगर कापून बोगद्यातून दुसरा रस्ता निर्माण करण्याची मागणी काणकोणवासीयांकडून होत आहे. या विषयावर बोलताना सर्व संबंधितांकडे सविस्तर चर्चा झाली व 30 जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी सांगितले.

यासंबंधी चर्चा करण्यासाठी काब्राल तसेच काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर यांनी संबंधितांची बैठक मडगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. विद्यमान रस्ता दुरुस्ती व रुंदीकरण केल्यास जवळजवळ 13,471 झाडे कापली जातील, असे सल्लागाराने अहवालात नमूद केले आहे. त्यामुळे काही पर्यावरणवादी नागरिकांचा त्यास विरोध आहे. पण प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही, असे आपण त्यांना सांगितल्याचे काब्राल म्हणाले.

हा रस्ता 3.9 किलोमीटरचा आहे व बोगदा जवळजवळ 1.5 कि. मी. अंतराचा आहे. त्यामुळे बोगद्याच्या दोन्ही बाजूला 750-750मीटर लांबी व 45 मीटर रुंदी असल्याने त्या परिसरातील झाडेही कापणे अपरिहार्य असणार आहे. शिवाय बोगदा रस्त्याला 600 कोटी रुपये तर सध्याच्या रस्ता दुरुस्तीला केवळ 100 कोटीच्या खर्चाचा अंदाज आहे, असे काब्राल म्हणाले. सभापती तवडकर यांनी महामार्ग दुरुस्तीची दखल घेतल्याबद्दल काब्राल यांचे आभार मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT