Nilesh Cabral  Dainik Gomantak
गोवा

Nilesh Cabral: बोडगेश्वर मंदिरात भरला जनता दरबार; मंत्री निलेश काब्राल यांनी केले लोकांच्या तक्रारींचे निरसन

समस्या मांडण्याची नागरिकांना मिळाली संधी

Akshay Nirmale

Goa Minister Nilesh Cabral: म्हापसा येथील बोडगेश्वर मंदिर सभागृह येथे उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित केलेल्या पहिल्या जनता दरबारात सोमवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) मंत्री निलेश काब्राल उपस्थित होते. त्यांनी लोकांशी संवाद साधत तक्रारींचे निरसन केले.

या जनता दरबाराच्या निमित्ताने लोकांना सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि इतर सरकारी प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची संधी लोकांना उपलब्ध झाली. ज्यामुळे त्यांना त्यांच्या समस्या मांडता आल्या आणि समाजाला प्रभावित करणार्‍या विविध समस्यांचे निराकरण करण्यास मदत झाली.

मंत्री नीलेश काब्राल यांनी उपस्थितांनी मांडलेल्या तक्रारी ऐकून घेतल्या आणि त्यांच्या समस्या दूर करण्यासाठी त्वरीत कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सार्वजनिक कल्याण सुनिश्चित करण्यासाठी आणि पारदर्शक आणि जबाबदार प्रशासनासाठी सरकारची वचनबद्धता या कार्यक्रमात दिसून आली.

यावेळी आमदार जोशुआ डीसुझा, केदार नाईक, मायकेल लोबो, डेलीलाह लोबो, अॅड. कार्लोस अल्वारेस फरेरा, म्हापशाच्या नगराध्यक्ष प्रिया मिशाळ, उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू_हागे, पर्यावरण संचालक स्नेहा गित्ते, उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक निधिन वाल्सन उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT