Revolutionary Goans Dainik Gomanatak
गोवा

Revolutionary Goans : कसणाऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याचा डाव; केरी - उसगावातील भूमिपुत्रांवर अन्याय

शेतकऱ्यांनी मांडली कैफियत: ‘आरजी’चा शेतकऱ्यांना पाठिंबा

गोमन्तक डिजिटल टीम

Revolutionary Goans कृषी उत्पादनातून संसार चालवणाऱ्या भूमिपुत्रांवर राज्यात अन्याय होत असून कसणाऱ्यांच्या जमिनी हिसकावण्याच्या या प्रयत्नांमुळे गोमंतकीय सध्या हवालदिल झाला आहे.

या राज्यात सरकार नावाची चीज आहे की नाही, असा सवाल त्यामुळेच उपस्थित होत असल्याने असे प्रकार होऊ नयेत, भूमिपुत्रांवर अन्याय होता कामा नये यासाठी सरकारने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षातर्फे करण्यात आली आहे.

राज्यात सध्या एका दिवसाचा क्रांतिदिन न होता, राज्यातील समस्या सोडवण्यासाठी रोजच क्रांती व्हायला हवी, असेही आरजीचे नेते विश्‍वेश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

फोंड्यातील क्रांती मैदानावर आज (रविवारी) आरजी पक्षातर्फे बोलावण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केरी तसेच उसगावच्या भूमिपुत्रांनी आपली व्यथा मांडली.

प्रियोळ मतदारसंघातील नाळे - केरी येथील शेलावती गावडे व कुटुंबीय तसेच वाळपई मतदारसंघातील गाळवाडा - उसगाव येथील ज्ञानेश्‍वर गावडे, बिंदिया गावडे कुटुंबीयांनी आपली कैफियत मांडताना गेली कित्येक वर्षे लागवडीखाली आणलेल्या जमिनी भाटकरांकडून परस्पर विकण्याचा प्रकार सध्या घडला असल्याचे सांगितले.

विश्‍वेश नाईक, रामचंद्र गावडे तसेच आरजीच्या इतर कार्यकर्त्यांनी राज्यातील भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्याकडे सरकार दुर्लक्ष करीत असल्याने भूमिपुत्रांच्या समस्या वाढत चालल्या आहेत, कसणाऱ्या हातांना जमीन नाही, बेरोजगारी वाढली आहे.

महागाईचा कळस झाला असून या सर्व समस्या सोडवण्यासाठी विद्यमान सरकारने प्रयत्न करायला हवेत, असे विश्‍वेश नाईक यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT