CM Dainik Gomantak
गोवा

Goa Government: आढावा घेऊन निष्क्रिय महामंडळे करणार बंद

मुख्यमंत्री ः ईडीसीकडून 86.20 लाखांचा लाभांश

गोमन्तक डिजिटल टीम

राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या निष्क्रिय महामंडळांचा आढावा वित्त विभागाकडून घेऊन ती बंद करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज दिली. आर्थिक विकास महामंडळाकडून (ईडीसी) सरकारच्या हिश्‍श्‍याचा 86 लाख 20 हजार रुपयांचा लाभांश महामंडळाचे अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या हस्ते मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाला ईडीसीचे व्यवस्थापकीय संचालक, बी. एस. पै आंगले, उपाध्यक्ष संजय सातार्डेकर व सहव्यवस्थापकीय संचालक बी. एस. बोरकर उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले, ईडीसी राज्यातील औद्योगिक आणि सेवा क्षेत्रातील प्रकल्पांसाठी तसेच मुख्यमंत्री रोजगार योजना आणि इतर योजनांद्वारे नवीन उद्योजकांना प्रोत्साहन देत आहे.

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यात आणि राज्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी महामंडळाची भूमिका महत्त्वाची आहे.

महामंडळे तोट्यात

राज्यातील अनेक महामंडळे ही तोट्यात असून काही अंशी निष्क्रिय आहेत. यात तिळारी सिंचन, हस्तकला, वन, खादी ग्रामोद्योग, कदंबा यासह काही महामंडळे आर्थिकदृष्ट्या सरकारवर ओझे बनली आहेत.

मात्र, काही मंडळांमधून नागरी सेवा सुविधा पुरविल्या जात असल्याने ती सुरू ठेवावीच लागणार आहेत. याबाबत वित्त विभागाकडून लवकरच आढावा घेण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

History: कर्नाटक, महाराष्ट्र ते आंध्र: सहा शतके दख्खनवर अधिराज्य गाजवणाऱ्या 'चालुक्य' घराण्याची शौर्यगाथा

SCROLL FOR NEXT