खनिज वाहतूक  Dainik Gomantak
गोवा

पिसुर्लेत सर्रास अवैध खनिज वाहतूक

गोवा फाऊंडेशनची याचिका: 12 रोजी सुनावणी

दैनिक गोमन्तक

पणजी: ज्या भागात गेली 20 वर्षे खनिज उत्खनन झाले नाही. तेथील खनिज मालाची वाहतूक पिसुर्लेतून केली जात आहे, असा दावा करणारी जनहित याचिका गोवा फाऊंडेशनने सादर केली आहे. ही याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठ याच्यासमोर नोंदवण्यात आली असता त्यावरील सुनावणी येत्या 12 एप्रिलला ठेवण्यात आली आहे.

पिसुर्ले गावातून मोठ्या प्रमाणात खनिजवाहू ट्रक वाहतूक करत आहेत. या वाहतुकीमुळे तेथे होणारे धूळ प्रदूषण तसेच असलेला धोका हे गृहित धरून पिसुर्लेच्या लोकांनी आंदोलन केले होते.

या वाहतुकीसाठी खाण कंपन्यांनी परवानगी घेतलेली नाही असा दावा ग्रामस्थांनी करून वाहतूक रोखली होती. त्यावेळी डिचोलीचे उपजिल्हाधिकारी व डिचोली पोलिस निरीक्षक यांनी खनिजवाहू ट्रकांना पोलिस संरक्षण देत वाहतूक पुन्हा सुरू केली होती. यावेळी झालेल्या आंदोलनावेळी काही ग्रामस्थांना ताब्यात घेण्यात आले होते. गावातून वाहतुकीला परवाना नसताना ती कशी केली जाते असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला होता.

दरम्यान, या बेकायदा खनिजवाहू प्रकरणी गोवा फाऊंडेशनने जनहित याचिका सादर केली आहे. ज्या भागातून हा खनिज माल उचलून तो वाहतूक केला जात आहे तेथे गेल्या 20 वर्षात खनिज उत्खनन झालेलेच नाही. ही खनिजवाहू सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करून करण्यात येत असल्याने त्याची चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती याचिकादाराने केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sancoale: पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला, खोटं सांगून केलं दुसरं लग्न; सांकवाळच्या प्रभारी सरपंचांवर गुन्हा दाखल

Goa Politics: '..राहुल गांधींकडे सर्व प्रकार मांडणार'! अमित पाटकर यांनी दिली माहिती; काँग्रेस, NSUI मधील वाद शिगेला

Bits Pilani: ‘बिट्स पिलानी’त विद्यार्थी मृत,कॅम्पसमधील धक्कादायक घटना; पोलिसांचा चहूबाजूंनी तपास

Rashi Bhavishya 17 August 2025: करिअरमध्ये प्रगती, प्रवासाचे योग ; मात्र आरोग्याकडे लक्ष द्या

"तीन वर्षांत 9 विद्यार्थ्यांनी अभ्यासाच्या दडपणामुळे आयुष्य संपवलं, अभ्यासक्रमाचा फेरविचार करावा", आलेमाव यांची सरकारकडे मागणी

SCROLL FOR NEXT