Union Minister Narendra Singh Tomar

 

Dainik Gomantak 

गोवा

शेतकरी स्वयंपूर्ण झाल्यास...: नरेंद्रसिंग तोमर

देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कृषी क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

केपे: परदेशातून आयात होणाऱ्या खाद्यावर अवलंबून न राहिल्यास आमच्या देशाला आत्मनिर्भर होण्यास कोणीच रोखू शकत नाही असे पंतप्रधान मोदी म्हणतात व यासाठी देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने कृषी क्षेत्राकडे वळण्याची गरज आहे, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर (Narendra Singh Tomar) यांनी सांगितले. ते केपे येथे आयोजित केलेल्या कृषी मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून हजर होते. या मेळाव्याला शेतकऱ्यांची बरीच मोठी उपस्थिती होती.

यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant), उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, खासदार विनय तेंडुलकर, केपेच्या नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, उपनगराध्यक्ष विल्यम फेर्नांडिस व इतर मान्यवर उपस्थित होते.

गोवा सरकारने (Goa Government) स्वयंपूर्ण योजना उत्तमरीत्या राबवली असून ती फक्त गोव्यापुरती सीमित न राहता स्वयंपूर्ण भारत होण्यास याचा लाभ देशाला मिळेल असे तोमर यांनी सांगितले. गोव्याची अर्थव्यवस्था पर्यटन व खाणीवर अवलंबून आहे पण कोविड काळात पर्यटन उद्योगावर गदा आली ते पाहता कृषी क्षेत्रात माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर (Manohar Parrikar) यांनी कामाला सुरुवात केली होती ते काम प्रमोद सावंत यांनी योग्य प्रकारे पुढे नेऊन अर्थव्यवस्थतेत बळकटी आणण्याचे काम उत्तमरीत्या केले असे तोमर यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळावे यासाठी प्रयत्नशील असून केंद्र सरकारने (Central Government) शेतकऱ्यांसाठी अनेक योजना मार्गी लावल्या आहेत असे त्यांनी सांगितले. फक्त मोठ्या शेतकऱ्यांसाठी नाही तर देशातील छोट्या शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची मदत घेऊन शेती करावी यासाठी मोदी यांनी देशात दहा हजार शेतकरी उत्पादक संघ सुरू करण्याच्या कामाला प्रारंभ केला आहे असे तोमर यांनी सांगितले.

राज्यातील युवक शेतीकडे वळू लागले आहेत ही आनंदाची गोष्ट असून राज्य स्वयंपूर्ण होत चालले आहे असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले. राज्यात फक्त भात शेती, ऊस काजू यापूर्ती मर्यादित न राहता मत्स्योत्पादन व पशुपालन या उद्योगांची शेतीला जोड दिली पाहिजे असे त्यांनी सांगितले. नवीन तंत्रज्ञान वापरून शेती केल्यास याचा जास्त फायदा मिळू शकतो त्यासाठी सर्वसमावेशक शेतीवर भर देण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. राज्य स्वयंपूर्ण करण्यासाठी राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत सरकारी योजना पोहचविण्यासाठी स्वयंपूर्ण मित्राद्वारे हे काम सरकारतर्फे केले गेले आहे असे त्यांनी सांगितले.

गोवा हे कृषिप्रधान राज्य बनावे यासाठी मी प्रयत्नशील असून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना तयार केल्या आहेत असे उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी सांगितले. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पिकावर आमच्या सरकारने चांगली आधारभूत किंमत शेतकऱ्यांना दिली असून उपकरणे घेण्यासाठी दिले जाणारे अनुदान सरकारकडून पूर्वीच दिले जात असल्याने शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे असे कवळेकर यांनी सांगितले. राज्य सरकारच्या योजनाबरोबर केंद्र सरकारच्या योजना सुद्धा वेळेवर शेतकऱ्यांना मिळवून देण्यास आमचे कृषी खाते अग्रेसर आहे असे कवळेकर यांनी सांगितले.

यावेळी उत्कृष्ट शेती करणाऱ्या 8 शेतकऱ्यांचा तोमर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तसेच काही शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते कृषी कार्ड ही देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Bike Theft: मडगाव पोलिसांची मोठी कारवाई! दुचाकी चोरणाऱ्या हरियाणाच्या 20 वर्षीय तरुणाला अटक; दोन वाहने जप्त

T20 World Cup 2026: विश्वचषकात मोठा उलटफेर! लागोपाठ दोन पराभव अन् पावसाचा फटका; कांगारुंचं पॅकअप, झिम्बाब्वेची सुपर-8 मध्ये एन्ट्री

Bangladesh New PM: तारिक रहमान यांनी घेतली बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ, दोन हिंदू नेत्यांना मिळालं मंत्रिमंडळात स्थान; जगाचं वेधलं लक्ष VIDEO

Shimga Extra Buses For konkan: आमच्या दाराशी हाय शिमगा.. कोकणातल्या चाकरमान्यांसाठी 'लालपरी' सुस्साट; 75 जादा गाड्यांची घोषणा

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पदरात पडणार 'होळीचं मोठं गिफ्ट'! महागाई भत्ता 'इतक्या' टक्क्यांनी वाढणार; खात्यात जमा होणार ज्यादा रक्कम

SCROLL FOR NEXT