Heavy Rain
Heavy Rain Dainik Gomantak
गोवा

राजधानी पणजीसह गोव्यात 'मुसळधार'; गोवेकरांची दाणादाण

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार बॅटिंग पाहायला मिळत असून आज सोमवारी सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसामुळे राजधानी पणजीत पुन्हा एकदा पाणी तुंबलं असून ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाल्याचं चित्र आहे. (Heavy Rain in Goa News Update)

मुसळधार पावसाने राजधानी पणजीसह आसपासच्या परिपरातही दाणादाण उडाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्या सर्वसामान्य गोवेकरांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पाणी साचल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेजला पोहोचण्यात अडचणी येत आहेत, तर कामावर जाणारेही पावसामुळे खोळंबले आहेत. पणजीसह बांबोळी, मिरामार परिसरात पाणी भरल्याने गोवा विद्यापीठात जाणारे विद्यार्थी, तसंच गोमेकॉमध्ये जाणारे रुग्ण यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रविवारी रात्रीपासूनच गोव्यात सर्वदूर पावसाने दमदार हजेरी लावली आहे. पणजी मार्केटमध्ये पाणी साचल्यामुळे विक्रेत्यांसह सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. तर मिरामार सर्कलकडे पाणी साचल्याने वाहतूक खोळंबल्याचं चित्र होतं. दुसरीकडे बांबोळी परिसरात गोमेकॉजवळील सबवे पाण्याने भरल्याने पाणी रस्त्यावर आलं आणि मडगाव-वास्कोच्या दिशेने जाणारी वाहतूक मंदावली. पाऊस असाच सुरु राहिला तर अन्य सखल भागांमध्येही पाणी भरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पणजीसह म्हापसा, सत्तरी, पेडणे, मडगाव, फोंडा, काणकोण परिसरातही तुफान पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान आणखी चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT