problem of water in Goa Dainik Gomantak
गोवा

गोव्यात सरकारी पाण्याची दिवसाढवळ्या चोरी

सरकारला लाखो रुपयांचे नुकसान

दैनिक गोमन्तक

केपे: कुडचडे येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाचा टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी खामामळ-कुडचडे येथे फिलिंग पॉईंट उभारण्यात आला आहे. या पॉईंटजवळ संबंधित खात्यातर्फे कोणाचीच नियुक्ती न केल्याने पाण्याची दिवसाढवळ्या चोरी होत असल्याने सरकारला लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणीपुरवठा विभागाने फिलिंग पॉईंट ओसाड सोडल्याने जो तो येऊन टँकरद्वारे पाणी चोरून नेत असल्याने सरकारी तिजोरीला लाखोंचा फटका बसत आहे.

यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी चौकशी करणार असल्याचे सांगितले. आज सायंकाळी कुडचडे येथे एक टँकर ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्याच्या कडेला कलंडला. त्यातून ट्रकचालक बचावला, त्यावेळी त्याला विचारले असता टँकरद्वारे सांडपाणी प्रकल्पासाठी पाणीपुरवठा करण्यात येत असून, हे पाणी खामामळ येथून आणले जात असल्याचे त्याने सांगितले. मात्र तेथे उपस्थित असलेल्या कंत्राटदाराच्या अभियंत्याने हे पाणी प्रकल्पासाठी काम करणाऱ्या सुमारे 60 कामगारांसाठी नेण्यात येत असल्याचे सांगितले. त्यासाठी पैसेही दिले जात असून ते पैसे कोणाला दिले जातात, हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: माहेरी गेलेली बायको परत आली नाही, नैराश्यातून तीन पोरींचा जीव घेऊन स्वतःला संपवलं; सुधाकरनं ओलांडली 'क्रूरतेची सीमा'

PM Kisan Nidhi 23rd Installment: पीएम किसानचा 2,000 रुपयांचा हप्ता उद्या खात्यात! यादीत नाव नसल्यास पैसे अडकू शकतात, आत्ताच अशी करा पडताळणी

Goa Development: गोव्यासाठी दिल्लीतून सुटला तब्बल 2000 कोटींचा निधी! केंद्र आणि राज्य सरकार मिळून गोव्याचा चेहरामोहरा बदलणार; कामतांचा विश्वास

Goa Tourism: 'पर्यटनात विविधता, कुशल मनुष्यबळ निर्मितीवर सरकारचा भर', राज्यात 5 नवीन महाविद्यालयांची मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

Goa Water Crisis: "गोव्यातील पाणीटंचाईला सावंत सरकारच जबाबदार", युरी आलेमाव यांचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT