Ban on sea Bathing  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: लाटा पाहण्यावरच पर्यटकांचे समाधान; समुद्र खवळल्याने सासष्टीतील किनारे ओस

वादळाच्या भीतीने तसेच मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथील किनारे ओस पडले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

Fatorda : अरबी समुद्रात वादळ निर्माण झाल्या असल्याने राज्य सरकारने समुद्र स्नानासाठी राज्यात बंदी घातली आहे. त्यामुळे सासष्टीतील किनाऱ्यावर दाखल होणाऱ्या पर्यटकांना किनाऱ्यावरून उसळत असलेल्या लाटा पाहण्यावर समाधान मानावे लागत आहे.

या वादळाच्या भीतीने तसेच मुसळधार पावसाची शक्यता असल्याने येथील किनारे ओस पडले आहेत.

मागील काही दिवसापूर्वी पडलेल्या मॉन्सूनपूर्व पावसामुळे साष्टीतील बाणावली, कोलवा, केळशी, मोबोर, बेतालभाटी येथील संपूर्ण किनारा लाटांनी व्यापला होता.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘बिपरजॉय’ वादळाचा तडाखा गोव्यातील किनारपट्टीसह कोकण राज्यातील किनाऱ्यांना बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती.

त्यामुळे सरकारने समुद्रात मासेमारी करण्यासाठी, जलक्रीडा तसेच समुद्र स्नानावर बंदी घातलेली आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ घटली आहे. किनाऱ्यावर धोक्याचे बावटे लावले आहेत.

सूचना धुडकावून पर्यटकांची मनमानी

गुजरातच्या दिशेने गेलेल्या चक्रीवादळाचा गोव्याला धोका नसला तरी समुद्र खवळलेला असल्याने किनारपट्टीत प्रतितास 50 ते 60 किमी वेगाने वारे वाहत असल्याने उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे.

त्यामुळे स्थनिकांनी तसेच पर्यटकांनी किनाऱ्यांवर जाऊ नये, अशी सूचना हवामान खात्याने दिली आहे. तरीही काही हौशी पर्यटक किनाऱ्यावर दिसत आहेत. समुद्र स्नानासाठी मज्जाव असला तरीही काही जण जीवन रक्षकांची नजर चुकवून समुद्र स्नानासाठी समुद्रात उतरताना दिसतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

SCROLL FOR NEXT