मुंबई उच्च न्यायालयाचे Goa खंडपिठ
मुंबई उच्च न्यायालयाचे Goa खंडपिठ दैनिक गोमन्तक
गोवा

Goa: वेस्टर्न बायपास रस्ता बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल

दैनिक गोमन्तक

Goa: सुरावली ते बाणावली (Suravali To Benaulim) या दरम्यानचा 2.75 किमी अंतराचा पश्चिम बगल (Western bypass) रस्ता बांधण्यासंदर्भात निकाल देण्यापूर्वी आपली बाजूही ऐकून घ्यावी अशी मागणी करणारी हस्तक्षेप याचिका (Intervention petition) बाणावली येथील साळ नदी बचाव आंदोलनाच्या कार्यकर्त्या रॉयला फर्नांडिस (Social Worker Royla Fernandes) यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा पिठात (Goa Bench) दाखल केली. हे 2.75 किलोमीटरचे क्षेत्र जैव विवीधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील असल्याने या भागात रस्ता मातीचा भराव घालून बांधण्याऐवजी स्टिल्टवर बांधावा अशी त्यांची मागणी असून त्यांनी यापूर्वी यासाठी राष्ट्रीय हरित लवादासमोर (National Green Arbitration) दावा दाखल केला होता. लवादाने या दाव्याची दखल घेत फर्नांडिस यांनी जे हरकतीचे मुद्दे पुढे आणले होते त्यावर विचार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमून अभ्यास करण्याचा आदेश दिला होता.

या रस्त्या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्वेच्छा दखल घेत जी जनहित याचिका विचारात घेतली होती तिची सुनावणी बुधवारी होणार त्यापूर्वी फर्नांडिस यांनी आज ही याचिका दाखल केली. ही याचिका न्यायालयाने वर्ग करून घेतली असल्याची माहिती त्यांनी दिली. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पावसकर यांनी या बगल रस्त्याचे जे काम राहिले होते, त्याला गणेश चतुर्थी नंतर सुरवात केली जाईल अशी माहिती दिली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT