Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात पाच दिवस यलो अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Goa Weather Update: उत्तर आणि दक्षिण गोव्यात 19, 20, 22 आणि 23 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

Pramod Yadav

Goa Weather Update

गोव्यात आजपासून (19 जून) पाच दिवस पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. याकाळात राज्यात 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने वर्तवली आहे.

तसेच, पुढील तीन तास उत्तर गोव्यात विविध ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वेधशाळने वर्तवली आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, गोव्यात 19 ते 25 जून या काळात पावसाची शक्यता असून, यातील पाच दिवस बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरुपचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

उत्तर आणि दक्षिण गोव्यात 19, 20, 22 आणि 23 जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 21 जून रोजी तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसतील असा अंदाज खात्याने वर्तवला आहे.

उत्तर गोव्यासाठी पुढील तीन तास महत्वाचे

उत्तर गोव्यात पुढील तीन तास महत्वाचे असून, जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

दरम्यान, गोव्यात पावसाचा जोर मंदावला असून, आत्तापर्यंत 490 मिमी पाऊस पडणे अपेक्षित होते. मात्र, आत्तापर्यंत 454.9 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर मंदावल्याने सरासरीच्या तुलनेत सात टक्क्यांनी पाऊस घटला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: 'किंग'चा लाजिरवाणा कमबॅक: 7 महिन्यांनी परतला, पण फक्त 8 चेंडू खेळून 'शून्य'वर बाद; लज्जास्पद विक्रमाची नोंद VIDEO

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

SCROLL FOR NEXT