फोंडा, राज्यातील भाजपचे सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे, त्यामुळेच जनतेच्या समस्या वाढल्या आहेत, असा दावा गोवा फॉरवर्डचे नेते तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी फोंड्यात आयोजित जनता दरबारमध्ये केला.
फोंड्यातील विठ्ठल रखुमाई मंदिरात फोंडा तसेच धारबांदोडा तालुक्यातील लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबारचे आयोजन आज (शुक्रवारी) करण्यात आले होते, त्यावेळी पत्रकारांशी बोलताना विजय सरदेसाई यांनी सरकारच्या नाकर्तेपणावर बोट ठेवले.
यावेळी काँग्रेसचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर, गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत, अकबर मुल्ला, विशांत नाईक तसेच कामगारनेते ॲड. हृदयनाथ शिरोडकर, ट्रिबेलो सौझा आदी उपस्थित होते.
जनता दरबारमध्ये फोंडा तसेच धारबांदोडा तालुक्यातील बऱ्याच लोकांनी आपल्या समस्या या जनता दरबारमध्ये मांडल्या. काहींना सरदेसाई यांनी लगेच फोन करून दिलासा दिला तर काही विषय आपण विधानसभेत मांडू, असे आश्वासन दिले.
सरदेसाई म्हणाले की, सरकारकडून लोकांची कामे होत नाहीत. विकासकामे निकृष्ट असून ती कोसळत आहेत.
आज पेडण्यात
आमदार विजय सरदेसाई हे शनिवार, १३ रोजी सकाळी १० ते दुपारी वाजेपर्यंत पेडणे येथील विश्राम धाममध्ये पेडणे व मांद्रे मतदारसंघातील लोकांची गाऱ्हाणी ऐकून घेतील. उत्तर गोवाचे अध्यक्ष दीपक कळंगुटकर म्हणाले की, पेडणे व मांद्रेचे आमदार आपण सत्ताधारी पक्षात आहोत, आपण प्रश्न विचारू नयेत, असा समज करून घेऊन अनेक ज्वलंत प्रश्न विधानसभेत विचारत नाहीत,असेही ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.