Goa weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather: लाहीलाही! मार्चमधील तिसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद; वायुप्रवाह बदलांमुळे उष्मा अधिक

Goa Weather In March: फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिक हैराण झाले.

Sameer Panditrao

Goa Summer Updates

पणजी: राज्यात फेब्रुवारी अखेरीपासून मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत असून नागरिक हैराण झाले आहेत. राज्यातील वाऱ्याच्या प्रवाहातील बदलांमुळे हा उष्मा जाणवत असून यंदा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक तिसऱ्या क्रमांकाच्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली असल्याचे गोवा वेधशाळेचे संचालक नहुष कुलकर्णी यांनी ‘गोमन्तक’ला सांगितले.

यंदा राज्यात उष्म्याच्या झळा अधिकच लवकर जाणवायला सुरुवात झाली. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात तापमानाचा पारा ३७ अंशांवर पोहोचला, त्यामुळे नागरिक हैराण झाले. मार्चच्या सुरुवातीपासून उष्मा कायम असल्याने त्याचा तडाखा नागरिकांना बसला आहे.

किनारी भागात या उष्म्याचा प्रभाव अधिक जाणवत आहे. दुपारी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत उष्म्याचा प्रभाव अधिक असतो. रात्री काही भागात थंडी तर किनारी भागात उष्मा जाणवतो; परंतु कमाल तापमानात काही प्रमाणात घट होते. नागरिकांनी या वाढत्या उष्म्यापासून योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

तापमानवाढीची शक्यता

आज राज्यात कमाल ३३.३ अंश सेल्सिअस तर किमान २४.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य तापमानाच्या तुलनेत दोन अंशांनी अधिक आहे. पुढील दोन दिवस राज्यात तापमानाचा पारा कमाल ३६ व किमान २४ अंशादरम्यान राहणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Accidental Deaths In Goa: 2025 मध्ये 335 लोकांनी गमावला जीव, गोव्यात एकूण 525 अपघात; निष्‍काळजीपणामुळे जास्त बळी

Marathi Drama Competition: मराठी राज्य नाट्य स्पर्धेत ‘द लास्ट सेल’चा डंका! वाचा स्पर्धेचा सविस्तर निकाल..

Bangladesh Violence: पेट्रोलचे 5 हजार मागितले अन् हिंदू तरुणाला कारखाली चिरडले, BNP नेत्यानं घेतला जीव; बांगलादेशात पुन्हा रक्ताची होळी

म्हादई अभयारण्यात कोत्राच्या नदीपात्रातून, पाच-सहा किमी डोंगर दऱ्या पार करून 'सिद्धेश्‍वराच्या गुंफे'कडे पोहोचता येते..

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

SCROLL FOR NEXT