Goa Politician Sex Scandal Case Dainik Gomantak
गोवा

Goa Politician Scandal: तुमच्या नात्यातील कुठल्याही स्त्रीची अशी नाहक बदनामी झाली असती तर तुम्हाला चालले असते?

मंत्री कथीत सेक्स स्कँडल: त्या महिलेचे गिरीश चोडणकर यांना खुले पत्र

दैनिक गोमन्तक

Goa Politician Sex Scandal Case

गोव्यातील एका मंत्र्याचे कथित सेक्स स्कँडल उघडकीस आणल्याचा दावा करणारे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे नियमित निमंत्रित सदस्य गिरीश चोडणकर यांना त्या महिलेने एक खुले पत्र लिहून तुमच्या नात्यातील एखाद्या महिलेची अशी नाहक बदनामी केली असती तर तुम्हाला काय वाटले असते असा सवाल केला आहे.

या प्रकरणी त्या महिलेने वास्को पोलीस स्थानकावर अज्ञाता विरोधात तक्रार दिली असून आपला फोटो समाज माध्यमावर अपलोड करून आपली बदनामी केली जात असल्याची तक्रार दाखल केली आहे.

चोडणकर यांनी काल एक ट्विट करून भाजपाचा गोव्यातील एक कॅबिनेट मंत्री सेक्स स्कँडलमध्ये गुंतल्याचा आरोप केला होता. एका राजकारणी महिलेचे त्यांनी अपहरण करून आपल्या फार्म हाऊसवर त्याने त्या महिलेला नेले असे म्हटले होते. त्यांनतर एका मंत्र्यांचा आणि एका महिलेचा एकत्रित असलेला फोटो समाज माध्यमावर फिरू लागला होता.

अशी घटना कधी घडलीच नव्हती. चोडणकर यांनी आपले नाव वृथा बदनाम केले आहे असा दावा तिने केला आहे. काँग्रेस नेत्यांच्या अशा वागण्यामुळेच लोकांचा काँग्रेस पक्षावरील विश्वास उडत चालला आहे असाही दावा त्या महिलेने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

SCROLL FOR NEXT