Pilgao Farmers Protest Impacts Mineral Transport Dainik Gomantak
गोवा

Pilgao Farmers Protest: डिचोलीतील ट्रकमालकांमध्ये अस्वस्थता! शेतकरी आंदोलनाचा आठवा दिवस; मध्यस्थीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Pilgao Farmers Protest Impacts Mineral Transport: पिळगावमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या आठ दिवसांपासून खनिज वाहतूक बंद असल्यामुळे डिचोलीतील ट्रकमालकांची अस्वस्थता वाढली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: पिळगावमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे गेल्या आठ दिवसांपासून खनिज वाहतूक बंद असल्यामुळे डिचोलीतील ट्रकमालकांची अस्वस्थता वाढली आहे. या आंदोलनाच्या प्रश्नावर कंपनी व्यवस्थापनाने त्वरित आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीही आधीच आर्थिक संकटात गटांगळ्या खाणाऱ्या ट्रकमालकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी डिचोली ट्रकमालक संघटनेने केली आहे.

कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासकीय यंत्रणेने पुढाकार घेऊन शेतकरी आंदोलनाच्या प्रश्नावर ‘सुवर्णमध्य’ काढावा, अशी मागणी करीत ट्रकमालकांनी डिचोलीच्या (Bicholim) उपजिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन दिले. डिचोली ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष राजाराम (सतीश) गावकर आणि सरचिटणीस सुभाष किनळकर यांच्या नेतृत्वाखाली ट्रक मालकांच्या शिष्टमंडळाने आज (बुधवारी) डिचोलीचे उपजिल्हाधिकारी रोहन कासकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.

आंदोलनप्रश्नी ट्रकमालकांच्या शिष्टमंडळाने उपजिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करताना ट्रकमालकांची व्यथा त्यांच्यासमोर मांडली. शेतकऱ्यांच्या (Farmer) आंदोलनप्रश्नी तोडगा निघून खनिज वाहतूक सुरू झाली नाही, तर ट्रकमालकांच्या अडचणी वाढणार, असे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणणे आहे. तत्पूर्वी मंगळवारी रात्री ट्रकमालकांची कंपनी व्यवस्थापना बरोबर बैठकही झाली होती. या बैठकीतही ट्रकमालकांनी आपली बाजू व्यवस्थापनासमोर मांडल्याचे खात्रीलायक माहिती आहे.

राजाराम गावकर. अध्यक्ष, ट्रकमालक संघटना

खाणबंदी काळापासून गेल्या जवळपास १२ वर्षांपासून ट्रकमालक आर्थिक संकटात अडकलेले आहेत. बारा वर्षांपासून ट्रकमालक आर्थिक संकटातून सावरलेले नाहीत. ट्रकमालकांच्या डोक्यावर आर्थिक ओझे आहे. केवळ ट्रकमालकच नव्हेत. तर खाण अवलंबीत घटक संकटात आहेत. या संकटातून सुटका व्हायची असल्यास खनिज व्यवसाय सुरळीतपणे सुरू होणे काळाची गरज आहे. त्यासाठी सरकारनेही या प्रश्नी लक्ष घालावे.

सुभाष किनळकर, सरचिटणीस, ट्रकमालक संघटना

ट्रकमालक शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटायलाच पाहिजेत. त्यासाठी कंपनी व्यवस्थापनाने सर्वमान्य तोडगा काढावा. सरकारनेही (Government) गंभीर पावले उचलून शेतकऱ्यांचे प्रश्न जाग्यावर घालण्यासाठी पुढाकार घ्यावा. यापूर्वीही म्हणजे २०१८ साली ट्रकमालकांनी कामगारांना पाठिंबा देताना जवळपास अडीज महिने ट्रक बंद ठेवले होते. खाणबंदीचा सर्वात मोठा फटका ट्रकमालकांना बसत आहे. शेतकरी आणि जनतेने ट्रकमालकांचाही विचार करावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

RO Water: आर.ओ.चं पाणी खरंच आरोग्यासाठी घातक? तज्ज्ञ डॉक्टरांनी स्पष्टच सांगितलं; अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी जाणून घ्या

Budh Margi 2026: "तुमची स्वप्ने होणार पूर्ण, बुध ग्रहाचा मेगा धमाका'' 21 मार्चपासून 'या' 7 राशींच्या नशिबात मोठा राजयोग

High Court: 'रागाच्या भरात मुलगी बापावर बलात्काराचा आरोप कधीच करणार नाही', जन्मठेपेची शिक्षा कायम ठेवताना हायकोर्टाने ओढले ताशेरे; काय नेमकं प्रकरण?

डोळ्यांत पाणी अन् हृदयात धडधड... कुवेतमध्ये अडकलेल्या उर्वशी रौतेलाला विमानातचं कोसळलं रडू; युद्धजन्य स्थितीतील मांडली व्यथा VIDEO

SCROLL FOR NEXT