People travelling From Maharashtra to Goa via Ferry service, At Terekhol, Keri, Goa
People travelling From Maharashtra to Goa via Ferry service, At Terekhol, Keri, Goa  Nivrutti Shirodkar / Dainik Gonmantak
गोवा

Goa: तपासणीची बोंब, मात्र कोरोना चाचणी सक्तीची

Nivrutti Shirodkar

मोरजी: गोव्यात (Goa) प्रवेश करायचा असेल तर निगेटिव्ह सर्टिफिकेट (Corona Test Certificate) आणि दोन्ही लस झाले (Complete Vaccination) असतील तरच प्रवेश मिळतो, पण केरी तेरेखोल (Terekhol, Kerim) येथे गेल्यावर वेगळे चित्र दिसून येते. महाराष्ट्र भागातील लोक (People's of Maharashtra) केरी तेरेखोल फेरी बोटीच्या (via Ferry Boat Service) सहाय्याने गोव्यात थेट प्रवेश करतात (Entered into Goa), पहाटे पासून फेरी बोटी अगदी भरून येतात, मात्र गोवेकाराना महाराष्ट्रात जाता येत नाही. दोन्ही राज्यांच्या सरकारांनी संयुक्तरीत्या दोन्ही राज्याच्या हिताचा निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक (Citizens of Goa) करत आहेत. कोरोना व्हायरसमुळे (Corona Virus) तालुक्यातील चेक नाके संकटात (Check Post in Trouble) असून चोरवाटातून (Thieves way) काही बिगरगोमंतकीय (Non - Goan) व्यापारी (Businessman), मजूर (Labors), नागरिक (Citizens) शेजारच्या राज्यात ये-जा (Up & Down form nearby State) करत असतात, तेरेखोल येथे फेरीबोटीतून चोरमार्गाने रेडी (Redi), शिरोडा (Shiroda), आरोंदा (Aaronda), या भागातील नागरिक तेरेखोलला येत असत व तेरेखोल केरी फेरीबोटीतून ते सरळ राज्यात यायचे आपले व्यवहार करायचे व परत फेरीबोटीतून जात असत, त्यामुळे फेरीबोटीतून येणारे सर्वच जण तेरेखोल भागातील किंवा राज्यातील असायचे हे कुणीही सिद्ध करू शकत नव्हते, फेरीबोटीतून येणाऱ्याची कुणी चौकशी करत नाही.

शेजारच्या राज्याच्या सीमेलगत गावातील नागरिक, मासळी घेऊन केरी, किरंणपाणी भागात यायचे, शेजारच्या राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे चेकनाक्यावर अस्वस्थता दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आणि चोरवाटातून राज्यात प्रवेश केला जात असल्याने नाकेही असुरक्षित बनले आहेत. तेरेखोल गावात एकूण 70 कुटुंब वास्तव्य करत आहेत ते अधिकाधिक शिरोडा, आरोदा, वेंगुर्ला भागात बाजारात जाऊन सामान आणायचे त्यांना तो भाग जवळचा होता, काही लोक केरी पेडणे बाजाराला यायचे पण या लॉक डाऊन काळात सिंधुदूर्ग भागातील नागरिक चोर मार्गाने तेरेखोल भागात येऊन फेरीबोटमार्गे राज्यात प्रवेश करायचे, व आजही चालू आहे. केरी तेरेखोल बोटीतून महाराष्ट्र येथील नागरिक मोठ्या संख्येने येतात त्याची कोणीच तपासणी करत नाही. सरकारने फेरी बोट सेवा हि फक्त कोरोना काळात तेरेखोल वासीयांच्या सेवेसाठी कार्यरत केली आहे, या सेवेचा गैरवापर होताना दिसत आहे. तो सरकारने थांबवावा अशी मागणी होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Bloomberg Billionaires Index: मुकेश अंबानी जगातील 11वे सर्वात श्रीमंत व्यक्ती; ब्लूमबर्गने 'सुपर रिच' लोकांची यादी केली जाहीर

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

SCROLL FOR NEXT