Goa Congress Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: काँग्रेस उमेदवारीचे गूढ अद्याप कायम

Goa Lok Sabha Election: नाव जाहीर करायला मुहूर्त मिळेना : आज-उद्या निर्णय शक्य : पाटकर

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Lok Sabha Election: गोव्यातील काँग्रेसचे उमेदवार ठरविण्यासाठी आज (बुधवारी) काँग्रेस नेत्यांची पक्षश्रेष्ठींसोबत बैठक झाली, हे जरी खरे असले तरी उमेदवार कोण, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे गोव्यातील उमेदवार कोण, हे गूढ कायम राहिले आहे.

आज दिल्लीत आमची काँग्रेस नेत्यांबरोबर बैठक झाली. उमेदवारीबाबत चर्चाही झाली; पण कोणताही निर्णय घेण्यात आला नाही.

कदाचित गुरुवारी किंवा शुक्रवारी हा निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती या बैठकीला उपस्थित असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिली.

आज झालेल्या बैठकीस सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि वेणुगोपाल हे नेते उपस्थित होते.

गोव्याचे प्रतिनिधित्व प्रभारी माणिकराव ठाकरे, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि अमित पाटकर यांनी केले. या बैठकीत काय चर्चा झाली, असा प्रश्र्न विचारला असता हा तपशील आम्ही उद्याच जाहीर करू, असे सांगत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले.

‘या’ नावांवर झाला खल:-

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील बैठकीत दक्षिण गोव्यासाठी विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांच्यासह गिरीश चोडणकर आणि कॅप्टन विरिएतो फर्नांडिस अशी तीन नावे चर्चेत आली.

मात्र, सार्दिन आणि चोडणकर यांच्या नावावर अधिक चर्चा झाली. उत्तर गोव्यात खलप आणि विजय भिके या दोन नावांची चर्चा झाल्याचे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: आधी 'मौजमजा करण्यासाठी गोव्यात या' म्हणणारे, आता ‘गोवाच विकत घ्या’ म्हणताहेत..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशी दिवशी 5 ग्रहांचा महायोग, 'या' राशींना मिळणार बंपर लाभ

Paliem: कुळवाड्यांनी शेकडो वर्षांपूर्वी भूमातेची पूजा आरंभली! निसर्गसंपन्न 'पालये' गाव; भोम येथील महाकाय वटवृक्ष

Opinion: प्लेटो दाखवून देतो, ‘लोकशाही’ शहाणपणापेक्षा ‘लोकप्रिय’ मताला प्राधान्य देऊन, हुकूमशाहीचा मार्ग सुकर करते

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

SCROLL FOR NEXT